
अत्याधुनिक तंत्रज्ञान ः अत्यंत संवेदनशिल नोंदीजळगावमध्ये तापमानाचा पारा अखेर 49 अंश सेल्सिअसच्या वर गेला. काल (ता.29) दुपारी एक वाजून 16 मिनीटांनी जळगावमधील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 49.2 अंस सेल्सिअस नोंदले गेले. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात "सकाळ' च्या माध्यमातून पोचली. "इ सकाळ' च्या माध्यमातून जगभर पोचली. आज (ता. 30) या बातमीविषयी संपूर्ण महाराष्ट्रातून जळगावकरांना विचारणा व्हायला लागली. त्यात कुतूहल, जिज्ञासा, चिंता आणि उपहास असा अनेक भावनांचे मिश्रण अनुभवाला आले. यातूनच मुद्दा 49 अंश तापमानाचा समोर आला. एक बाब प्रथम स्पष्ट करायला हवी ती म्हणजे, जी मंडळी ही ऐतिहासीक नोंद लोकांच्यापर्यंत पोचवू शकले नाहीत, त्यांनी या मुद्याचा उलटा प्रवास सुरू केला. हे कसे शक्य आहे ? लोक कसे राहू शकतील ? ज्यांनी हे नोंदले किंवा सांगितले त्यांच्या तंत्रज्ञानाविषयी शंका असावी ? असेही मुद्दे समोर आले.49.2 अंश तापमानाची नोंद ही रस्त्यावरच्या कोणत्याही संस्थेने केलेली नाही. जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या जैन उद्योग समुहाच्या ग्रीनहाऊसमधील अत्याधुनिक यंत्रणेच्या संगणक मापनावर ही नोंद झाली आहे. सर्वाधिक तापमानाची ही नोंद केवळ 15 मिनीटांसाठी आहे. 1 वाजून 02 मिनीटाला तापमान 47 अंश, 1 वाजून 17 मिनीटाला 49.02 आणि 1 वाजून 32 मिनीटाला पुन्हा 48 अंश सेल्सिअस अशी नोंद आहे.जळगाव शहरात अजून दोन वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तापमानाची नोंद केली जाते. तेथे वापरल्या जाणाऱ्या पद्धतीविषयी शंका घेण्याचे कारण नाही. किंवा त्यांचीच पद्धत खरी असे कोणीही छाती टोकून सांगू शकत नाही. आता मुद्दा हा आहे की, जैन उद्योग समुहातील ग्रीन हाऊसमधील नोंद कितपत विश्वासार्हा मानावी ?जैन उद्योग समुहाचे शेती संशोधन केंद्र मोहाडी रस्स्यावरील जैन हिल्स परिसरात आहे. तेथे उतीसंवंर्धन केंद्रात विविध पिकांच्या रोपांसाठी ग्रीनहाऊस उभारले आहे. या ग्रीन हाऊसमधील तापमान कमाल आणि किमान 27 सेल्सिअस ठेवावे लागते. सापेक्ष आर्द्रता 70 टक्के असावी लागते. म्हणजे रोजच तापमान नोंदविणे व ते नियंत्रणात ठेवण्याचे काम. पूर्वी केवळ ग्रीन हाऊसमधील तापमानाची नोंदणी आणि निरीक्षण केले जात होते. यात सूर्याच्या किरणांची प्रखरता, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान याच्या नोंदी केल्या जातात. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. भवरलाल जैन यांनी बाहेरील तापमानाच्या नोंदीसाठी डिसेंबर 2002 मध्ये अमेरिकन तंत्रज्ञान असलेली संगणक प्रणाली मागविली. आपल्या भागातील शेतकऱ्यांना तापमानाचे निष्कर्ष देता यावेत हीच त्या मागची भावना होती. अर्थात बारमतीच्या प्रतिभा प्रतिष्ठानमध्ये ज्या प्रणालिचा उपयोग केला जातो तिच ही प्रणाली.वॉचडॉग ही अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीने सूर्याच्या किरणांची प्रखरता, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान नोंदविण्यासाठी स्पेक्ट्रम सिस्टिम विकसीत केली आहे. ग्रीन हाऊसच्या बाहेर सेन्सर लावण्यात आला आहे. त्याला प्रती 20 मिनीटांचा अवधी देत तापमान नोंदविण्याची सोय केली आहे. या सर्व नोंदी संगणक करतो. माणूस नाही. या सेन्सरजवळ नेहमीचे तापमापकही जोडलेले आहे.काल (ता. 29) याच सेन्सरच्या संवेदशिलतेवरुन 49.02 अंश सेल्सिअसची नोंद झाली. या साऱ्या माहितीचे विश्लेषण करणारी व्यक्ती कोण आहे ? त्या आहेत कल्याणी किरण मोहरीर. त्यांचे शिक्षण बीएस्सी बॉटनी, एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी. कामाचा अनुभव 1996 पासून याच ग्रीन हाऊसमध्ये वातावरणाच्या, तापमानाच्या बदलाच्या नोंदी करणे त्या अभ्यासणे. आता हे सारेच विश्वासार्हा असल्यावर अविश्वास ठेवणार कोण ? आहेत काही जण. त्यापैकी एक शासकीय यंत्रणा. जिच्याकडे कोणत्याही अत्याधुनिक सोयी- सुविधा नाहीत अशी अधिकारी- कर्मचारी मंडळी. बरे, तापमान अधिकच वाढले म्हटल्यावर वेगळ्या मागण्या पुढे येवू नयेत ही प्रशासन प्रमुखाला चिंता. वाढीव तापमानामुळे दुष्काळाच्या तीव्रतेचा लाभ घेण्याची प्रवृत्ती वाढू नयेही, ही सुद्दा चिंताच. आणि काही जणांना वृत्त चुकल्याची चिंता. म्हणूनच, थेट सारे समाजून घेण्याचा आणि वाचकांच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न केला. (या विषयाच्या संदर्भात कोणाकडेही काहीही शास्त्रशुद्ध माहिती असल्यास "सकाळ"कडे पाठवा. किंवा तेट बोला 9881099189 वर)जगाच्या पाठीवरही नोंदजळगावच्या काल (ता.29) च्या तापमानाची नोंद जगाच्या पाठीवरही झालेली आहे. ही नोंद योग्य असल्याचा हा दुसरा पुरावा. जगभरातील हवामानाचा, वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या अनेक संस्था आहेत. उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीवरून सध्याचे वातावरण आणि पुढील 24 तासाचे वातावरण या विषयी या संस्था अंदाज देतात. या पैकीच एक असलेल्या ऍक्युव्हेदर डॉट कॉम या संस्थेच्या वेबसाईटवरही कालचे जळगावचे तापमान 49 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. या वेबसाईटवर हवामानाशी संबंधित अनेक बाबी आपण पाहू शकतो. येथे एक उलेल्ख करावा लागेल. तो म्हणजे चार वर्षांपूर्वी पाऊस कृत्रिम पद्धतीने पाडण्याचा प्रकल्प वर्षा हा प्रयोग शेगाव (जि. बुलडाणा) येथून राबविला जात होता. त्यावेळी "व्हेदर मॉडिफिकेशन' याच वेबसाईटवर उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ढगांच्या छाचित्रावरुन अंदाज घेत किमान पाचहाजर फूट उंचावर हेलिकॉप्टर पाठवून पुरेसे बाष्प असलेल्या ढगांमध्ये (काळे ढग) द्रावण फवारून कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडला जात होता. (कृत्रिम पाऊस नाही. पाऊस खराच मात्र, तो पाडण्याची पद्धत मानवी...कृत्रिम)
No comments:
Post a Comment