
भारताच्या या पुढील पंतप्रधान महिला असण्याची शक्यता अधिक आहे. कारण, या पदासाठी बहुमताची जुळवाजूळव करण्यासाठी मायावती, जयललीता, ममता, सोनिया यांच्या सहकार्याची किंवा पसंतीची गरज पडणार आहे. या चारही महिलांच्या तुलनेत मायावती यांचे पारडे मला जड वाटते. त्याची कारणे १) मायावती सध्या उत्तरप्रदेश सारख्या सर्वांत मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. २) कोणत्याही घटकाशी- पक्षाशी त्या तडजोड करु शकतात. (राजकारणाच्या पूर्वार्धात त्यांनी सवर्णांना शत्रू मानले. आता उत्तर्धात त्यांनी चक्क यू टर्न घेत सर्व सवर्णांशी जमवून घेतले आहे नव्हेतर, सत्तेत सहभागही दिला आहे) ३) स्वतःच्या स्वार्थासाठी त्या कोणत्याही व्यक्तीशी तडजोड करु शकतात ४) त्यांचे अर्थकारणही सशक्त आहे ५) त्यांचे दलित असणे हे जसे त्यांना पंतप्रधानपदाकडे नेणारे आहे तसे ते इतरांना सहकार्यासाठी प्रवृत्त करणारे आहे. (देशाची पहिली महिला आणि त्यात पुन्हा दलित महिला पंतप्रधान करण्यासाठी आम्ही पाठींबा देत आहोत, हे अनेकांना सांगणे सोयीचे होईल). मायावती यांच्यानंतर महिला पंतप्रधान होण्याची संधी सोनिया यांनाच आहे. त्याची काही कारणे १) १८ व्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटप करताना घटक पक्षांनी काँग्रेसला अगदीच दुय्यम वागणूक दिली आहे. (उदा. लालूप्रसाद- रामविलास पास्वान यांचे बिहारमधील जागा वाटप, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली रस्सीखेच) हे पाहता काँग्रेस पक्ष फार काळ श्री. मनमोहनसिंग यांना नेते मानमार नाही. काँग्रेस खतरेमे है म्हणत, सारी सत्तालोभी मंडळी सोनियाजी तुम्हीच पंतप्रधान व्हा असा गळा काढतील. २) राहूल गांधी यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करुन सोनियाजींना कधीतरी पंतप्रधानपद स्वीकारावे लागेल ३) इतर घटक पक्षांतील काही मंडळींना सोनियाजींच्या नावाने दिल्लीतील सोयीचे राजकारण करणे शक्य होते, ती मंडळीही फार दिवस श्री. मनमोहनसिंग यांना नेता मानणार नाहीत. उर्वरीत जयललीता व ममता यांचा फारतर पाठींबा म्हणून सहभाग असेल. त्यांना पंतप्रधानपदाची संधी दिसत नाही. मात्र, त्यांची पसंती ग्राह्य राहील.
मी सहमत आहे.
ReplyDeleteमी सुध्दा असेच लेख लिहिले आहे. कृपया rkjumle.wordpress.com ही लिंक पहावी.