भारतातील गुन्ह्यांसाठी ‘वॉन्टेड’ मात्र परदेशात आश्रित असलेल्या संशयित गुन्हेगारांच्या घरवापसीचा मुद्दा याकूब मेमनच्या फाशीनंतर चर्चेत आला. शरणार्थी असूनही याकूबला फाशी देण्यात आली, त्यामुळे भारतीय न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडतो आहे, असेही फसवे चित्र मुस्लिम धर्मियांमध्ये रंगविले जात आहे. हाच मुद्दा पुढे करून संगितकार नदीम सैफी हा सुद्धा भारतात परतायला तयार नाही असा चुकिचा प्रचार होत आहे. नदीमचे उदाहरण देत असताना पाकिस्तानचा गायक अदनान सामी हा मात्र, भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून भारताचे नागरिकत्व मागत आहे, याकडे कडवी मुस्लिम मंडळी कसे काय दुर्लक्ष करू शकते?