Friday, July 30, 2010
व्यक्तिमत्त्वांची घाऊक चोरी
संपर्काचे अतिजलद माध्यम म्हणून आतरजालाच्या दुनियेत (इंटरनेट) सोशल नेटवर्किंग झपाट्याने लोकप्रिय होत आहे. त्यासाठी फेसबुक सारखे नवा नवे पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. मैत्री वाढविणे, माहितीची देवाण घेवाण करीत व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगणे अशा गरजेतून फेसबूकचा वापर वाढतो आहे. कुटुंबात, समाजात किंवा कामाच्या ठिकाणी एकाकी असणारी मंडळी फेसबूक सारख्या सोशल नेटवकिर्ंंगमध्ये जिवाभावाचे मित्र शोधू लागले आहेत. फेसबूकवर आपले अकाऊंट असणे ही नेटिजन्ससाठी प्रतिष्ठेची बाब मानली जात आहे. पलिकडे कोण आहे, त्याची विश्वासार्हाता काय याचा सारासार विचार न करता केवळ संगणकाच्या पडद्यावर दिसेल तेवढ्या तुटपुंज्या माहितीवर ही मैत्री पुढे सरकत आहे. त्यातून फसवणूक, लुबाडणूक, हिरमोड होण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषत: एकाकी महिलांना, मुलींना तसे अनुभव आले आहेत. एकप्रकारे फेसबूकचा हा आंधळा वापर होत आहे. फेसबूकचा सरसकट वापर करणार्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. फेसबूकवर अकाऊंट असलेल्या जगभरातील किमान 10 कोटी लोकांची व्यक्तिगत माहिती इंटरनेटरील चोरांनी हस्तगत केली आहे. इंटरनेटवरील हेे चोर म्हणजे नेट हॅकर्स, नेट ट्रॅकर्स किंवा नेट क्रॅकर्स. इंटरनेटवर माहिती शोधण्याच्या कामासाठी सर्च इंजिन वापरावे लागते. त्यासाठी स्वत:चे अकाऊंट नोंदवावे लागते. कोणत्याही प्रकारचे संदेश पाठविण्यासाठी मेल अकाऊंट सुरू करावे लागते. सोशल नेटवर्किंग किंवा ब्लॉग सुरू करण्यासाठी अकाऊंट सुरू करावे लागते. या अकाऊंटमध्ये आपण आपली व्यक्तीगत माहिती नाव, वय, शिक्षण, जन्म तारीख, जन्म गाव, शाळेचे नाव, व्यवसाय, नोकरी आदी माहिती भरतो. तशी ही माहिती आपल्यासाठी सर्वसाधारण असतेे. जनगणनेच्या कामासाठी आलेल्या गणकाकडेही ही माहिती आपण भरून देतो. मात्र, ही माहिती अधिकृत व्यक्तिकडे दिल्यास किंवा अधिकृत संस्थेेकडे नोंदल्यास ती गोपनिय ठेवण्याची जबाबदारी संबंधितांची असते. जनगणनेसाठी दिलेली माहिती गोपनिय ठेवण्याचे वचन केंद्र सरकारही देते. इंटरनेट वापराच्या बाबतीत ही जबाबदारी नेटवर्किंगची सुविधा देणार्या सर्व्हिस प्रोव्हायडरची म्हणजे फेसबूकची आहे. या सर्वसाधारण माहितीचा उपयोग नेटवरील कोणत्याही सायबर क्राईमसाठी करता येतो. छायाचित्रांचा वापर अश्लिल कामासाठी केला जावू शकतो. आपल्या नावाने, छायाचित्रांचा वापर करुन डमी अकाऊंट इंटरनेटवर सुरू करुन त्याच्या माध्यमातून इतरांची फसवणूक केली जावू शकते. वाईटात वाईट कल्पना केली तर आपले स्वत:चे इंटरनेवरील अकाऊंट घातपाती कारवायांंसाठीही वापरता येवू शकते. इंटरनेटवरील चोर मंडळी जशी व्यक्तीगत माहिती चोरू शकते तशी ती आपले पासवर्डही सहज मिळवू शकते. इंटरनेटचा वापर करणार्यांनी अशा प्रकारच्या जोखमीच्या बाजूही वेळीच समजावू घेणे आवश्यक आहे. केवळ अधर्वट माहितीवर नेटिजन्स होण्याचा प्रकार म्हणजे स्वत:ला माहिती मायाजालाच्या दुष्टचक्रात अडकवून घेणे होय. त्यामुळे इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत किंवा कौटुंंबिक माहिती नोंदविताना काळजी घ्यायला हवी. इ बँकिंगचे व्यवहार करणार्यांनी बंँकेचे नाव, अकाऊंट नंबर, पासवर्ड अशा आर्थिक बाबी मुळीच नोंदवू नयेत. इंटरनेवर बक्षीस, लॉटरी याबाबत भुलभुलय्या ठरणार्या अनेक जाहिराती किंवा संदेश येतात. त्याच्या मोहजालात अडकायला नको. इंटरनेटचा वापर जसा व्यक्तिगत आणि जनहितार्थ आहे तसाच तो सामुहिक आणि विघातकही करणारे समाजकंटक अस्तित्त्वात आहेत, याचा वेळीच विचार करायला हवा. आता इंटरनेट साक्षर होण्याचीही गरज आहे.
Thursday, July 29, 2010
विक्रमादित्य सचिन
आपण मास्टरब्लास्टर का आहोत हे सचिनने बुधवारी आणि गुरूवारी श्रीलंकेविरूद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात खेळतांना दाखवून दिले. सचिन केवळ स्वार्थासाठी खेळतो अशी टीका त्याच्यावर होत होती. बुधवारी त्याने भारतीय संघ संकटात असतांना टिच्चून फलंदाजी केली आणि कारकिर्दीतले 48 वे शतक ठोकले. तो खेळपट्टीवर टिकला की विक्रम सहज होत असतो याचा प्रत्यय देखील आला. केवळ शतक ठोकण्याच्या इराद्याने तो खेळतो म्हणणे अनेकदा चुकीचे ठरले आहे. आदल्या दिवसाप्रमाणेच सचिनने गुरूवारी देखील टिच्चून फलंदाजी करत पाचवे द्विशतक झळकावले. त्याचे हे द्विशतक भारतीय फलंदाजांमध्ये विक्रमी ठरले. द्विशतकांच्या रांगेत श्रीलंकेचा संगकारा सात द्विशतके झळकावून अग्रस्थानी आहे. सचिन आता त्याच्यामागे दोन पावलांवर आहे. यापूर्वी मास्टरब्लास्टरनने कारकिर्दीत 1999 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध अहमदाबाद येथे पहिले द्विशतक झळकावले होते. त्यावेळी त्याने 217 धावा केल्या होत्या. यानंतर नागमूरमध्येही त्याने झिम्बाब्वेविरूद्ध अशीच कामगिरी केली होती. 2004 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्यांच्याच मायदेशात द्विशतक झळकावून आपण खंडाबाहेर संयमित फलंदाजी करु शकतो हे दर्शवून दिले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके असे एक ना अनेक विक्रम या मास्टरब्लास्टरच्या नावावर आहेत. अजून किती विक्रम याच्या नावावर लागतील हे भविष्यात जरी गूढ राहणारे असले तरी मास्टरब्लास्टर लवकरच कसोटी आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये शतकांचे शर्तक पूर्ण करेल हे सांगण्यास कोणत्या भविष्यवेत्याची गरज पडणार नाही. श्रीलंकेविरूद्धचा आणखी एक कसोटी सामना आणि ऑस्ट्रेलियन संघ भारत दौर्यावर दोन कसोटी सामने खेळणार असतांना सचिन या दोन मालिकांच्या दरम्यान नक्कीच हा विक्रम करेल. मास्टरब्लास्टरने आतापर्यंत कसोटीत 48 शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 46 शतके ठोकली आहेत. या दोन क्रिकेटच्या प्रारूपाची गोळाबेरीज केली होती. ती संख्या 94 वर जाते. म्हणजेच क्रिकेटच्या दोन प्रारूप मिळून सचिन शतकांचे शतकही साजरे करेल याविषयी कोणाच्याही मनात शंका नसावी.
Wednesday, July 28, 2010
महावीर जैन धर्मार्थ दवाखाना
नाशिकमधील देवधरलेनमधील श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि सर्वसामान्य घटकातील रुग्णांना सेवा देण्याचा वसा गेल्या तीन दशकांपासून जपला गेला आहे. ट्रस्टचे पदाधिकारी, कर्मचारी आणि विविध आजारांचे 40 तज्ज्ञ डॉक्टर्स यासाठी निरपेक्ष, नि:स्वार्थीपणे काम करीत आहेत. या सर्वांच्या निष्ठांची आणि धडपडीची कहाणी...
सध्या आरोग्यसेवा दोन प्रकारात मिळते. एक सरकारी, जीचे स्वरुप बिनभरवशाचे. दुसरी खासगी, जीचे स्वरुप महागडे. समाजातील आर्थिक दुर्बल आणि सर्व सामान्य घटकाला अत्याधुनिक आरोग्यसेवेचा दर परवडेल की नाही अशी शंका वारंवार घेतली जाते. नाशिक सारख्या विस्तारणार्या महानगरात आता लहान- सहान आजारावर गोळ्या- इंजेक्शन देणार्या फॅमिली डॉक्टरांची संख्याही कमी कमी होत चालली आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा बहुविध सेवा देणार्या हॉस्पिटलची संख्या वाढत आहे.
अशा हिशोबी वातावरणात अजून एक आरोग्यसेवेचा दिलासादायक प्रकार दिसतो. तो म्हणजे धर्मार्थ आरोग्यसेवेचा. गेल्या 33- 34 वर्षांपासून अशा प्रकारच्या सेवेचा निष्ठेने वसा जपला आहे तो रविवारपेठेतील देवधर लेनमधील श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याने.
सर्व सामान्य घटकाला अत्यंत कमी दरात आणि दारिद्रय रेषेखालील घटकांनामोफत सेवा देणार्या या दवाखान्यात बाह्यरुग्ण विभाग, विविध आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा पॉलिक्लिनिक विभाग, एक्स रे विभाग, कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजिकल लॅब, सोनोग्राफी सेंटर, डेंटल केअर युनिट, लसीकरण आणि क्षयरोग निदान केंद्र आहेत. समाजातील 40 ते 45 तज्ज्ञ डॉक्टर या विभागाच्या माध्यमातून आपल्या सेवा देत आहेत. खासगी स्वरुपात मिळणारी वैद्यकीय सेवा महागडी होत असताना धर्मार्थ स्वरुपात सेवा देणार्या या दवाखान्याची वाटचाल निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेच्या बळावर पुढे पुढे जात आहे. अडचणी आल्या तरी त्यावर समाजातील चांगुलपणाच्या बळावर मात केली जात आहे.
या रुग्णालयाची स्थापना ही दोघा तीघांच्या जिद्दीतून झाली. कोणताही स्वार्थ न बाळगता कमी पैशांत रुग्णसेवा करण्याचा विचार त्या मागे होता. दहा- बारा जणांनी मिळून हजार हजार रुपये गोळा केले. जमलेली रक्कम ठेव म्हणून बँकेत ठेवली. तीच्या व्याजाच्या रकमेतून सेवा देणे सुरू झाले. साधारणपणे तीन दशकांपूर्वी अवघ्या दोन रुपयांत रुग्णसेवा दिली जात होती. त्यावेळी केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू होता.
गरजू रुग्णांची संख्या वाढल्यानंतर इतर तज्ज्ञ डॉक्टरांची तसेच तपासण्यांची गरज भासू लागली. त्यामुळे पाचवर्षांनी पॉलिक्लिनीक विभाग (इतर तज्ज्ञसेवांचा विभाग) सुरू करण्यात आला. समाजातील काही डॉक्टरांना या विभागात सेवा देण्याची विनंती करण्यात आली. त्यापैकी अनेकांनी ती मान्य केली. मोफत नव्हे मात्र नाममात्र मानधन देवून इतर आजारांची तपासणी केली जावू लागली. साधारणपणे 25 वर्षांपूर्वी या तपासणीचा दर होता अवघा पाच रुपये. आजही तपासणीचा दर आहे अवघा पाच रुपये. यात रुगाणाला आवश्यक ती औषधे (गोळ्या) दिली जातात. इंजेक्शनसह शुल्क आहे अवघे 15 रुपये.
आज शासकीय रुग्णालयातही तपासणी शुल्क दहा रुपयांच्या पुढे गेले आहे. खासगी रुग्णालयात 150 ते 200 रुपयांच्या पुढे शुल्क आहे. असा स्थितीत अवघ्या पाच रुपयांत सेवा देणार्या महावीर दवाखान्याचे काम तेवढ्याच निष्ठेेन आणि व्यावसायिक तत्परतेने सुरू आहे.
येथील बाह्य रुग्णविभागात रोज किमान 60-70 रुग्ण येतात. पॉलिक्लिनिकमध्ये 25- 30 रुग्ण येतात. एक्सरेसाठी 12- 15 रुग्ण असतात. पॅथॉलॉजीसाठी 15- 20 रुग्ण असतात. या सार्या सेवा अवघ्या नाममात्र शुल्कात दिल्या जातात.
देवधर लेनमधील दवाखान्याचे कामकाज व्यवस्थित सुरू असताना सिडकोतील पवननगर भागातही दवाखान सुरू करण्यात आला. तेथेही रुग्णांची संख्या वाढतच आहे.
या ठिकाणी एक बाब आवर्जून नोंदवावी लागेल. ती म्हणजे दवाखान्याचे ट्रस्टी खरोखर समाजाचे विश्वस्त म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. येथील कोणत्याही सेवेतून किंवा आर्थिक बाबीतून लाभ घेण्याची त्यांना अपेक्षा नाही. धर्मार्थ दवाखाना आहे म्हणून देणगीदारांकडून पावत्या फाडून निधी जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचीही त्यांना अपेक्षा नाही. कर्मचारी वर्गही नम्रतापूर्वक उत्तमसेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे, हे आवर्जून लिहावे लागेल.
गरज असेल तेव्हा देणगीदार स्वत: निधी देतात किंवा लागणारी यंत्रणा, उपकरणे, सुविधा खेरदी करुन देतात. म्हणूनच आज देवधरलेनमध्ये दवाखान्याची स्वत:ची इमारत आहे. पवननगरमध्ये एका दानशूर व्यक्तीने नाव जाहीर न करताच दवाखान्याची इमारत बांधून दिली आहे.
ट्रस्टी आणि कर्मचार्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा लक्षात घेऊन समाजातील विविध 40 डॉक्टरही नि:स्वार्थीपणे येथे सेवा देत आहेत. ते समाजात बाहेर वैद्यकीय व्यवसाय करीत असले तरी या दवाख्यान्यात त्यांचा सहयोग सेवा देण्याचाच आहे.
टु डी इकोे कलर डॉपलर, पलमनरी फंक्शन टेस्ट, ब्रान्फोस्कोपी यासह विविध महागड्या तपासण्या येथे याच तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात अत्यंत अल्प दरात होत आहे. गरीब रुग्ण सेवा निधी अंतर्गत द्रारिद्रय रेषेखालील पिवळे कार्डधारक रुग्णांना मोफत सेवा तर केशरी कार्डधारक रुग्णांना अवघ्या 50 टक्के सवलतीच्या दरात सेवा दिली जात आहे. मध्यंतरी चिंतामुक्त शिबिर घेेऊन सर्वसामान्यांना आरोग्यासाठी आवश्यक रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, रक्तघटक अशा तपासण्या अल्पदरांत करुन देण्यात आल्या. नाक- कान- घसा तपासणी, कॅन्सर तपासणी, नेत्र- दंत तपासणी अशी शिबिरे वारंवार घेेतली जातात.
संस्थेच्या कामकाजासाठी कार्यकारणी सदस्य, वैद्यकीय समिती, आमंत्रीत सदस्य हे वळोवेळी सूचना, सहकार्य करतात.
कोणत्याही धर्मार्थ संस्थेचे अस्तित्व हे समाजाच्या सकारात्मक आणि क्रियाशिल सहकार्यावरच टीकून राहते. दोन्ही दवाखान्यांचा वार्षिक खर्च सरासरी 35 लाखांपर्यंत आहे. केवळ रुग्णांच्या शुल्कातून हा खर्च भरून निघत नाही. गरजेच्यावेळी देणगीदारांचे सहकार्य मिळते. अत्याधुनिक सेवांसाठी यंत्रणा खरेदी करायची तर निधी गोळा करण्याचेही आव्हान असतेच. ट्रस्टी मात्र कुठेही पावत्या घेऊन हिंडत नाहीत. संस्थेचे काम पाहूनच स्वयंप्रेरणेने दानशूर मंडळी निधी किंवा आवश्यक यंत्रणा देतात.
आगामी वर्षांत 200 खाटांचे धर्मार्थ रुग्णालय उभारण्याचा ट्रस्टींचा संकल्प आहे. यासाठी आर. टी. ओ. कार्यालयाजवळ दीडएकर जागाही घेण्यात आली आहे. येथे रुग्णालयाचा आराखडा मंजूर करण्यासाठी मनपाच्या लाफितीचा कारभार आडवा आलाच. जागा दवाखान्यासाठी वापरता येईल हॉस्पिटलसाठी नाही, असे संबंधित विद्वान बाबूंनी सांगितले. त्यामुळे आराखडा मंजूर होणे तब्बल पाच वर्षेे रखडले. या प्रकल्पासाठी सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये गोळा करण्याचा प्रयत्न आहे. अजून कोणाकडे एक रुपयाही मागण्यात आलेला नाही. मात्र, संकल्प साध्य होईल हा ट्रस्टींना विश्वास आहे.
अध्यक्ष हुकूमचंद बागमार, उपाध्यक्ष मोहनलाल साखला, सरचिटणीस डॉ. प्रकाश हिरण, खजिनदार नंदलाल पारख यांच्या सोबत इतर 22 सदस्य या दवाखान्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत.
भविष्य काळातील आरोग्यसेवेतील विविध आव्हाने लक्षात घेता श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्यासारख्या संस्था टिकल्या पाहिजेत याच हेतूने समजाने गरजेचे सहकार्य करायलाच हवे. कधी देणगी देवून तर कधी कौैतुकाचे चार शब्द बोलून.
(पत्ता - श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान, देवधर लेन, रविवार पेठ, नाशिक 1)
सध्या आरोग्यसेवा दोन प्रकारात मिळते. एक सरकारी, जीचे स्वरुप बिनभरवशाचे. दुसरी खासगी, जीचे स्वरुप महागडे. समाजातील आर्थिक दुर्बल आणि सर्व सामान्य घटकाला अत्याधुनिक आरोग्यसेवेचा दर परवडेल की नाही अशी शंका वारंवार घेतली जाते. नाशिक सारख्या विस्तारणार्या महानगरात आता लहान- सहान आजारावर गोळ्या- इंजेक्शन देणार्या फॅमिली डॉक्टरांची संख्याही कमी कमी होत चालली आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा बहुविध सेवा देणार्या हॉस्पिटलची संख्या वाढत आहे.
अशा हिशोबी वातावरणात अजून एक आरोग्यसेवेचा दिलासादायक प्रकार दिसतो. तो म्हणजे धर्मार्थ आरोग्यसेवेचा. गेल्या 33- 34 वर्षांपासून अशा प्रकारच्या सेवेचा निष्ठेने वसा जपला आहे तो रविवारपेठेतील देवधर लेनमधील श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याने.
सर्व सामान्य घटकाला अत्यंत कमी दरात आणि दारिद्रय रेषेखालील घटकांनामोफत सेवा देणार्या या दवाखान्यात बाह्यरुग्ण विभाग, विविध आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा पॉलिक्लिनिक विभाग, एक्स रे विभाग, कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजिकल लॅब, सोनोग्राफी सेंटर, डेंटल केअर युनिट, लसीकरण आणि क्षयरोग निदान केंद्र आहेत. समाजातील 40 ते 45 तज्ज्ञ डॉक्टर या विभागाच्या माध्यमातून आपल्या सेवा देत आहेत. खासगी स्वरुपात मिळणारी वैद्यकीय सेवा महागडी होत असताना धर्मार्थ स्वरुपात सेवा देणार्या या दवाखान्याची वाटचाल निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेच्या बळावर पुढे पुढे जात आहे. अडचणी आल्या तरी त्यावर समाजातील चांगुलपणाच्या बळावर मात केली जात आहे.
या रुग्णालयाची स्थापना ही दोघा तीघांच्या जिद्दीतून झाली. कोणताही स्वार्थ न बाळगता कमी पैशांत रुग्णसेवा करण्याचा विचार त्या मागे होता. दहा- बारा जणांनी मिळून हजार हजार रुपये गोळा केले. जमलेली रक्कम ठेव म्हणून बँकेत ठेवली. तीच्या व्याजाच्या रकमेतून सेवा देणे सुरू झाले. साधारणपणे तीन दशकांपूर्वी अवघ्या दोन रुपयांत रुग्णसेवा दिली जात होती. त्यावेळी केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू होता.
गरजू रुग्णांची संख्या वाढल्यानंतर इतर तज्ज्ञ डॉक्टरांची तसेच तपासण्यांची गरज भासू लागली. त्यामुळे पाचवर्षांनी पॉलिक्लिनीक विभाग (इतर तज्ज्ञसेवांचा विभाग) सुरू करण्यात आला. समाजातील काही डॉक्टरांना या विभागात सेवा देण्याची विनंती करण्यात आली. त्यापैकी अनेकांनी ती मान्य केली. मोफत नव्हे मात्र नाममात्र मानधन देवून इतर आजारांची तपासणी केली जावू लागली. साधारणपणे 25 वर्षांपूर्वी या तपासणीचा दर होता अवघा पाच रुपये. आजही तपासणीचा दर आहे अवघा पाच रुपये. यात रुगाणाला आवश्यक ती औषधे (गोळ्या) दिली जातात. इंजेक्शनसह शुल्क आहे अवघे 15 रुपये.
आज शासकीय रुग्णालयातही तपासणी शुल्क दहा रुपयांच्या पुढे गेले आहे. खासगी रुग्णालयात 150 ते 200 रुपयांच्या पुढे शुल्क आहे. असा स्थितीत अवघ्या पाच रुपयांत सेवा देणार्या महावीर दवाखान्याचे काम तेवढ्याच निष्ठेेन आणि व्यावसायिक तत्परतेने सुरू आहे.
येथील बाह्य रुग्णविभागात रोज किमान 60-70 रुग्ण येतात. पॉलिक्लिनिकमध्ये 25- 30 रुग्ण येतात. एक्सरेसाठी 12- 15 रुग्ण असतात. पॅथॉलॉजीसाठी 15- 20 रुग्ण असतात. या सार्या सेवा अवघ्या नाममात्र शुल्कात दिल्या जातात.
देवधर लेनमधील दवाखान्याचे कामकाज व्यवस्थित सुरू असताना सिडकोतील पवननगर भागातही दवाखान सुरू करण्यात आला. तेथेही रुग्णांची संख्या वाढतच आहे.
या ठिकाणी एक बाब आवर्जून नोंदवावी लागेल. ती म्हणजे दवाखान्याचे ट्रस्टी खरोखर समाजाचे विश्वस्त म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. येथील कोणत्याही सेवेतून किंवा आर्थिक बाबीतून लाभ घेण्याची त्यांना अपेक्षा नाही. धर्मार्थ दवाखाना आहे म्हणून देणगीदारांकडून पावत्या फाडून निधी जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचीही त्यांना अपेक्षा नाही. कर्मचारी वर्गही नम्रतापूर्वक उत्तमसेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे, हे आवर्जून लिहावे लागेल.
गरज असेल तेव्हा देणगीदार स्वत: निधी देतात किंवा लागणारी यंत्रणा, उपकरणे, सुविधा खेरदी करुन देतात. म्हणूनच आज देवधरलेनमध्ये दवाखान्याची स्वत:ची इमारत आहे. पवननगरमध्ये एका दानशूर व्यक्तीने नाव जाहीर न करताच दवाखान्याची इमारत बांधून दिली आहे.
ट्रस्टी आणि कर्मचार्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा लक्षात घेऊन समाजातील विविध 40 डॉक्टरही नि:स्वार्थीपणे येथे सेवा देत आहेत. ते समाजात बाहेर वैद्यकीय व्यवसाय करीत असले तरी या दवाख्यान्यात त्यांचा सहयोग सेवा देण्याचाच आहे.
टु डी इकोे कलर डॉपलर, पलमनरी फंक्शन टेस्ट, ब्रान्फोस्कोपी यासह विविध महागड्या तपासण्या येथे याच तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात अत्यंत अल्प दरात होत आहे. गरीब रुग्ण सेवा निधी अंतर्गत द्रारिद्रय रेषेखालील पिवळे कार्डधारक रुग्णांना मोफत सेवा तर केशरी कार्डधारक रुग्णांना अवघ्या 50 टक्के सवलतीच्या दरात सेवा दिली जात आहे. मध्यंतरी चिंतामुक्त शिबिर घेेऊन सर्वसामान्यांना आरोग्यासाठी आवश्यक रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, रक्तघटक अशा तपासण्या अल्पदरांत करुन देण्यात आल्या. नाक- कान- घसा तपासणी, कॅन्सर तपासणी, नेत्र- दंत तपासणी अशी शिबिरे वारंवार घेेतली जातात.
संस्थेच्या कामकाजासाठी कार्यकारणी सदस्य, वैद्यकीय समिती, आमंत्रीत सदस्य हे वळोवेळी सूचना, सहकार्य करतात.
कोणत्याही धर्मार्थ संस्थेचे अस्तित्व हे समाजाच्या सकारात्मक आणि क्रियाशिल सहकार्यावरच टीकून राहते. दोन्ही दवाखान्यांचा वार्षिक खर्च सरासरी 35 लाखांपर्यंत आहे. केवळ रुग्णांच्या शुल्कातून हा खर्च भरून निघत नाही. गरजेच्यावेळी देणगीदारांचे सहकार्य मिळते. अत्याधुनिक सेवांसाठी यंत्रणा खरेदी करायची तर निधी गोळा करण्याचेही आव्हान असतेच. ट्रस्टी मात्र कुठेही पावत्या घेऊन हिंडत नाहीत. संस्थेचे काम पाहूनच स्वयंप्रेरणेने दानशूर मंडळी निधी किंवा आवश्यक यंत्रणा देतात.
आगामी वर्षांत 200 खाटांचे धर्मार्थ रुग्णालय उभारण्याचा ट्रस्टींचा संकल्प आहे. यासाठी आर. टी. ओ. कार्यालयाजवळ दीडएकर जागाही घेण्यात आली आहे. येथे रुग्णालयाचा आराखडा मंजूर करण्यासाठी मनपाच्या लाफितीचा कारभार आडवा आलाच. जागा दवाखान्यासाठी वापरता येईल हॉस्पिटलसाठी नाही, असे संबंधित विद्वान बाबूंनी सांगितले. त्यामुळे आराखडा मंजूर होणे तब्बल पाच वर्षेे रखडले. या प्रकल्पासाठी सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये गोळा करण्याचा प्रयत्न आहे. अजून कोणाकडे एक रुपयाही मागण्यात आलेला नाही. मात्र, संकल्प साध्य होईल हा ट्रस्टींना विश्वास आहे.
अध्यक्ष हुकूमचंद बागमार, उपाध्यक्ष मोहनलाल साखला, सरचिटणीस डॉ. प्रकाश हिरण, खजिनदार नंदलाल पारख यांच्या सोबत इतर 22 सदस्य या दवाखान्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत.
भविष्य काळातील आरोग्यसेवेतील विविध आव्हाने लक्षात घेता श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्यासारख्या संस्था टिकल्या पाहिजेत याच हेतूने समजाने गरजेचे सहकार्य करायलाच हवे. कधी देणगी देवून तर कधी कौैतुकाचे चार शब्द बोलून.
(पत्ता - श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान, देवधर लेन, रविवार पेठ, नाशिक 1)
Tuesday, September 1, 2009
कर्जात बुडालेल्या महाराष्ट्राची कोटीच्या कोटी उड्डाणे !
डोक्यावर तब्बल एक लाख 76 हजार 730 रुपयांचे कर्ज असलेल्या महाराष्ट्र सरकारने गेल्या नऊ महिन्यांत विविध योजना व देय तरतुदींसाठी तब्बल 41 हजार 459 कोटी रुपये खर्चाच्या घोषणा केल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यातील प्रत्येक नागरीकाच्या डोक्यावर सध्या 66 हजार रुपयांचे कर्ज आहे.ष्ट्र शासनाचा आर्थिक ताळेबंद ज्यांना समजतो, त्यांना या घोषणांमधील "पोकळ वासा' सहज लक्षात येईल. राज्य शासनावर सध्या विविध सहा प्रकारची कर्जे आहेत. त्यात देशांतर्गत कर्ज 1 लाख 44 हजार 843, केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज किंवा अगाऊ रकमा (ओव्ह ड्राफ्ट) नऊ हजार 611 कोटी, कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी देणे 12 हजार 648 कोटी, तर कर्जावरील केवळ व्याज 14 हजार 723 कोटी आहे. अर्थसंकल्पबाह्य कर्जे तीन हजार 974 कोटी रुपये आहे. हा सर्व ताळेबंद 2009 - 2010 च्या अर्थसंकल्पात मांडला आहे. त्या तुलनेत आजची वस्तुस्थिती लक्षात घेतली तर सध्याचे कर्ज 1 लाख 90 हजार कोटी आहे. उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण किमान 29 टक्के आहे.ष्ट्र सरकारवरील कर्जाचा आकडा दरवर्षी फुगत चालला आहे. गेल्या अकरा वर्षांची आकडेवारी लक्षात घेतली तर हे लक्षात येईल. 1999-2000 मध्ये एकूण कर्ज 42 हजार 666 कोटी रुपये होते. 2000-01 मध्ये 61 हजार 081, 2001- 02 मध्ये 72 हजार 122, 2002- 03 मध्ये 82 हजार 549, 2003 - 04 मध्ये 97 हजार 674, 2004 - 05 मध्ये 1 लाख 9 हजार 166 , 2005 - 06 मध्ये 1 लाख 24 हजार 364, 2006 - 07 मध्ये 1 लाख 33 हजार 723, 2007 -08 मध्ये 1 लाख 42 हजार 383 आणि 2008 - 09 मध्ये 1 लाख 61 हजार 276 कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्र सरकारवर होते. इतर राज्यांच्या कर्जाचा विचार केल्यास कर्जदार राज्यांच्या यादीत महाराष्ट्र दुसरे ठरते. सध्या सर्वाधिक कर्ज उत्तर प्रदेश सरकारवर 1 लाख 88 हजार 197 कोटी रुपयांचे आहे. विविध कर्जमाफीएकीकडे राज्याच्या तिजोरीत रोख रकमेचा खडखडाट असताना राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारने मात्र विविध योजना किंवा देणी देण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या रकमांची घोषणा केल्या आहेत. विविध प्रकारच्या कर्जमाफीसाठी सात कोटी 541 रुपये घोषित केले आहे. यात शेतकऱ्यांना सरसकट 20 हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी 6,208 कोटी, आदिवासींना कर्जमाफीसाठी 200 कोटी, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळीच्या कर्जमाफीसाठी 1,108 कोटी, शेळी- मेंढी विकास महामंडळाच्या कर्जमाफीसाठी 9 कोटी, मोैलाना आझाद महामंडळाच्या कर्जमाफीसाठी 17 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.राज्य सरकारच्याअधीन असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सहावा वेतन आयोग मागणे सुरू केले आहे. सरकारनेही टप्प्याटप्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या आहे. यात सहावा वतन आयोग देण्यासाठी सरकारवर किमान 10 हजार 704 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. त्यात कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी 8,000 कोटी, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता देण्यासाठी 1 हजार 780 कोटी, वैद्यकीय अध्यापकांना वेतनवाढ देण्यासाठी 100 कोटी आणि पालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी 824 कोटी रुपयांची घोषणा केल्या आहेत.आघाडी सरकारने पाचवर्षांच्या काळात सत्तेवरून पाय उतार होत असताना अखेरच्या सहा महिन्यांत कोकण विकासासाठी 5 हजार 235 कोटी रुपयांचे आणि उत्तर महाराष्ट्र विकासासाठी 6 हजार 509 कोटी रुपयांचे असे दोन्ही मिळून 11 हजार 744 कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे.र् नियंत्रणासाठी 126 कोटी, रेशनवर पाच जीवनावश्यक वस्तू (पामतेल, साखर, तूरडाळ, गहू व तांदूळ) देण्यासाठी 122 कोटी, चारापाणी टंचाई निवारणासाठी 300 कोटींच्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय आकस्मिक निधीत 500 कोटीपर्यंत वाढही केली आहे.(महाराष्ट्र सरकारने गेल्या नऊ महिन्यांत केलेल्या घोषणा आणि महाराष्ट्राची गेल्या पाचवर्षांतील आर्थिक आकडेवारी स्पष्ट करणाऱ्या चौकटी आतील पानांत)
Wednesday, May 20, 2009
विक्रमवीर गावित आणि भाजपचे एकतर्फी वर्चस्व
खानदेशात लोकसभेच्या चार जागांपैकी जळगाव, रावेर व धुळे या तीन मतदारसंघांचे निकाल भाजप- शिवसेना युतीसाठी आणि नंदुरबार या एका मतदारसंघाचा निकाल कॉंग्रेससाठी अपेक्षित असा लागला आहे. या निकालाची दुसरी बाजू अशी, की जळगाव आणि रावेर या मतदारसंघांचा निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीसाठी अनुक्रमे धक्कादायक आणि काहीसा अपेक्षित असा लागला आहे. नंदुरबारमध्ये समाजवादी पक्षाच्या रूपाने उभे राहणारे आव्हान कॉंग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक पलटावून लावले आहे. खानदेशात चारपैकी तीन जागा जिंकणाऱ्या भाजपच्या यशात भाजपचे नेते नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या विक्रमी सभांचा सिंहाचा वाटा आहे.
नवव्यांदा माणिकराव गावित
नंदुरबार मतदारसंघात आघाडीतर्फे कॉंग्रेसचे विद्यमान खासदार तथा माजी मंत्री माणिकराव गावित हे नवव्यांदा विक्रम करीत विजयी झाले. त्यांना अत्यंत चुरशीच्या आणि आव्हानपूर्ण वातावरणात तब्बल 40 हजारांचे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या माध्यमातून शरद गावित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीसमोर आव्हान उभे केले होते. शरद गावित राज्यातील मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. त्यामुळे त्यांच्या माघारीचा व डॉ. गावित यांनी कॉंग्रेस प्रचारात सक्रिय होण्याचा मुद्दा वारंवार कॉंग्रेसतर्फे मांडला जात होता. शरद गावित यांनी मंत्री गावित यांचे जनसंपर्क प्रतिनिधी म्हणून जिल्हाभरात प्रभाव निर्माण केलेला असल्यामुळे त्यांची उमेदवारी माणिकराव गावित यांना अडचणीत आणणार, असे वाटत होते. मात्र, निकाल आणि मताधिक्याची टक्केवारी पाहता, माणिकराव गावित यांच्यावर प्रेम करणारा पारंपरिक मतदार आजही त्यांच्यामागे कायम असून, गावित- सुरूपसिंग नाईक आणि चंद्रकांत रघुवंशी या त्रिकुटाची जिल्ह्यावर पकड असल्याचे स्षट होते. येथे भाजप- शिवसेना युतीतर्फे रिंगणात असलेले सुहास नटावदकर यांचा चौथ्यांदा झालेला पराभव चटका लावून जातो. "राजकारण आपल्या घरचेच' असा समज करून असलेल्या मंत्री गावित आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षांना "लगाम' लावणारा हा निकाल आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत गावित- नाईक- रघुवंशी हे मंत्री गावित यांना घाम फोडल्यावाचून राहणार नाहीत.
धुळ्यात कॉंग्रेसकडूनच घात
धुळे मतदारसंघात युतीतर्फे भाजपचे शिक्षक आमदार प्रताप सोनवणे अवघ्या बारा हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांनी आघाडीकडून रिंगणात असलेले कॉंग्रेसचे सर्वार्थाने "पॉवरफुल्ल' आमदार अमरिश पटेल यांचा पराभव केला. अर्थात, या पराभवात कॉंग्रेसचे धुळ्यातील ज्येष्ठ नेते तथा आमदार रोहिदास पाटील व मालेगावातील ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रशांत हिरे यांची निष्क्रियता भोवली आहे. पाटील व हिरेद्वयी यांनी श्री. पटेल यांना उमेदवारी मिळाल्यापासून उघड विरोध केला होता. एवढेच नव्हे; तर ही मंडळी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या जाहीर सभांकडेही फिरकली नाहीत. त्यामुळे त्यांनी पक्षांतर्गत उघड बंडच केले होते. शिवाय, हे दोघेही मराठा समाजाचेच असल्यामुळे त्यांची निष्क्रियता श्री. सोनवणे यांच्या पथ्यावर पडली. कॉंग्रेसचे श्री. पटेल यांच्या जातीचा मुद्दा प्रथमच एवढ्या उघडपणे चर्चेत आला. भाजपचा पारंपरिक मतदार आणि पाटील- हिरे यांच्या दुसऱ्या पिढीचे थेट सहकार्य यातून अवघ्या 12 हजारांच्या मताधिक्याने का होईना श्री. सोनवणे विजयी झाले. मात्र, आता पाटील- हिरेद्वयी यांच्याबाबत पक्षांतर्गत काय निर्णय होणार? याविषयी उत्सुकता आहे. श्रीमती गांधी यांच्या सभा झालेल्या ठिकाणी पक्षाचा पराभव होता, ही बाब कॉंग्रेस पक्ष मोठ्या गांभीर्याने घेणार, हे निश्चित. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत रोहिदास पाटील हे खानदेश विकास प्रतिष्ठानच्या नावावर वेगळी खेळी खेळण्याची शक्यता आहे.
जळगावात जैन यांचा प्रभाव
जळगाव मतदारसंघाची जागा भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुन्हा परत मिळविली. युतीअंतर्गत भाजपमध्ये नवखे असलेले आणि निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले "एटी' उर्फ अशोक तापीराम पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळते खासदार वसंतराव मोरे यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला. ए. टी. पाटील यांच्या विजयात शिवसेनेत नुकतेच स्थिरावलेले सुरेशदादा जैन यांच्या प्रभावाचा मोठा हिस्सा आहे. श्री. जैन यांचे जळगाव शहर- जळगाव ग्रामीण भागासह इतर तालुक्यांत मोठ्या संख्येत समर्थक आहेत. श्री. मोरे 18 महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करून विजयी झाले होते, तेव्हा जळगावचा हा भाग जुन्या एरंडोल मतदारसंघास जोडलेला नव्हता. ए. टी. पाटील व श्री. मोरे हे पारोळा या एकाच गावातील व तालुक्यातील असूनही तेथे ए. टी. पाटील यांचेच हितचिंतक जास्त असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे श्री. मोरे यांच्यासाठी व रावेर मतदारसंघात प्रचारासाठी तीन वेळा दौऱ्यावर आले. त्यांनी पहिल्यांदा आक्रमकपणे विचार मांडले. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर परखडपणे टीका केली. कॉंग्रेसच्या नाराज पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. कारण, जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्यामुळे पहिल्या टप्प्यात कॉंग्रेसची मनधरणी करण्यातच बराच वेळा गेला. कॉंग्रेस नेतेही शेवटपर्यंत रावेरच्या जागेसाठी हटून बसले होते. अखेर, दाखवायचे म्हणून कॉंग्रेसची मंडळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर आली. मात्र, जैन व एकनाथ खडसे यांच्या प्रचाराच्या झंझावातासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन, राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील व अरुण गुजराथी यांचे प्रयत्न कमकुवत ठरले. गेल्या अठरा महिन्यांत श्री. मोरे यांनी खासदार म्हण
ून निधी खर्चाचा बऱ्यापैकी पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नाही, हाही मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जिल्ह्यात जागावाटपात कॉंग्रेससाठी जागावाटपाचा ताळमेळ साधावा लागणार आहे.
जावळे यांना पुन्हा संधी
रावेर मतदारसंघातून युतीतर्फे भाजपचे मावळते खासदार हरिभाऊ जावळे 25 हजार मताधिक्याने विजयी झाले. येथे मराठा जातीचे कार्ड प्रभावी वाटत असताना जावळे यांनी मिळविलेला विजय हा त्यांचा व्यक्तिगत संपर्क, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार गिरीश महाजन यांचे वर्चस्व सिद्ध करणारा आहे. श्री. महाजन यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड. रवींद्र पाटील उमेदवार होते. श्री. पाटील यांची राजकीय कुवत मर्यादितच होती; पण त्यांचे मराठा असणे आणि या मतदारसंघात मराठा समाजाचे गठ्ठा मतदान असणे याचा काही मेळ घातला येईल का? याचाच विचार स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी केला होता. बहुतांशी तो विजयाच्या जवळ जाणारा होता, हे जावळे यांना मिळालेले कमी मताधिक्य दर्शविते. जावळे यांना केवळ लेवा पाटीदार समाजाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविणे, हे भाजपमधील काही नेत्यांनाही मान्य नव्हते; परंतु श्री. खडसे, पांडुरंग फुंडकर, श्री. महाजन, डॉ. राजेंद्र फडके, चैनसुख संचेती आदींनी घेतलेली मेहनत विजय निश्चित करून गेली. श्री. खडसे हे भाजपअंतर्गत राजकारण करताना पक्षाच्या राज्यस्तरावरील संघटनात्मक पदांवर लक्ष ठेवून आहेत. श्री. मुंडे यांच्यापाठोपाठ त्यांनाही महत्त्वाकांक्षा आहेच. रावेरसह जळगावची जागा परत मिळविल्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपची उमेदवारी देताना, तसेच शिवसेनेचे उमेदवार देतानाही खडसे- जैन संमतीचा प्रभाव राहणारच आहे.
जळगाव- रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंगेसला कॉंग्रेसची निष्क्रियता अपयशाकडे नेणारी ठरली. हा पराभव ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नाराज करणारा आहे. खानदेशात श्री. पवार यांचे आपल्याकडे मुक्कामी थांबणे किंवा आपल्या निवासस्थानी जेवण घेणे, अशा गोष्टींचे प्रचारासाठी भांडवल करणारे नेते आहेत. मात्र, या नेत्यांना अशा प्रभावाचे मतांमध्ये रूपांतर करता येत नाही, हे जळगाव महापालिका निवडणूक व आताच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. म्हणूनच, विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला नव्याने मांडणी करावी लागणार आहे.
नवव्यांदा माणिकराव गावित
नंदुरबार मतदारसंघात आघाडीतर्फे कॉंग्रेसचे विद्यमान खासदार तथा माजी मंत्री माणिकराव गावित हे नवव्यांदा विक्रम करीत विजयी झाले. त्यांना अत्यंत चुरशीच्या आणि आव्हानपूर्ण वातावरणात तब्बल 40 हजारांचे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या माध्यमातून शरद गावित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीसमोर आव्हान उभे केले होते. शरद गावित राज्यातील मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. त्यामुळे त्यांच्या माघारीचा व डॉ. गावित यांनी कॉंग्रेस प्रचारात सक्रिय होण्याचा मुद्दा वारंवार कॉंग्रेसतर्फे मांडला जात होता. शरद गावित यांनी मंत्री गावित यांचे जनसंपर्क प्रतिनिधी म्हणून जिल्हाभरात प्रभाव निर्माण केलेला असल्यामुळे त्यांची उमेदवारी माणिकराव गावित यांना अडचणीत आणणार, असे वाटत होते. मात्र, निकाल आणि मताधिक्याची टक्केवारी पाहता, माणिकराव गावित यांच्यावर प्रेम करणारा पारंपरिक मतदार आजही त्यांच्यामागे कायम असून, गावित- सुरूपसिंग नाईक आणि चंद्रकांत रघुवंशी या त्रिकुटाची जिल्ह्यावर पकड असल्याचे स्षट होते. येथे भाजप- शिवसेना युतीतर्फे रिंगणात असलेले सुहास नटावदकर यांचा चौथ्यांदा झालेला पराभव चटका लावून जातो. "राजकारण आपल्या घरचेच' असा समज करून असलेल्या मंत्री गावित आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षांना "लगाम' लावणारा हा निकाल आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत गावित- नाईक- रघुवंशी हे मंत्री गावित यांना घाम फोडल्यावाचून राहणार नाहीत.
धुळ्यात कॉंग्रेसकडूनच घात
धुळे मतदारसंघात युतीतर्फे भाजपचे शिक्षक आमदार प्रताप सोनवणे अवघ्या बारा हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांनी आघाडीकडून रिंगणात असलेले कॉंग्रेसचे सर्वार्थाने "पॉवरफुल्ल' आमदार अमरिश पटेल यांचा पराभव केला. अर्थात, या पराभवात कॉंग्रेसचे धुळ्यातील ज्येष्ठ नेते तथा आमदार रोहिदास पाटील व मालेगावातील ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रशांत हिरे यांची निष्क्रियता भोवली आहे. पाटील व हिरेद्वयी यांनी श्री. पटेल यांना उमेदवारी मिळाल्यापासून उघड विरोध केला होता. एवढेच नव्हे; तर ही मंडळी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या जाहीर सभांकडेही फिरकली नाहीत. त्यामुळे त्यांनी पक्षांतर्गत उघड बंडच केले होते. शिवाय, हे दोघेही मराठा समाजाचेच असल्यामुळे त्यांची निष्क्रियता श्री. सोनवणे यांच्या पथ्यावर पडली. कॉंग्रेसचे श्री. पटेल यांच्या जातीचा मुद्दा प्रथमच एवढ्या उघडपणे चर्चेत आला. भाजपचा पारंपरिक मतदार आणि पाटील- हिरे यांच्या दुसऱ्या पिढीचे थेट सहकार्य यातून अवघ्या 12 हजारांच्या मताधिक्याने का होईना श्री. सोनवणे विजयी झाले. मात्र, आता पाटील- हिरेद्वयी यांच्याबाबत पक्षांतर्गत काय निर्णय होणार? याविषयी उत्सुकता आहे. श्रीमती गांधी यांच्या सभा झालेल्या ठिकाणी पक्षाचा पराभव होता, ही बाब कॉंग्रेस पक्ष मोठ्या गांभीर्याने घेणार, हे निश्चित. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत रोहिदास पाटील हे खानदेश विकास प्रतिष्ठानच्या नावावर वेगळी खेळी खेळण्याची शक्यता आहे.
जळगावात जैन यांचा प्रभाव
जळगाव मतदारसंघाची जागा भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुन्हा परत मिळविली. युतीअंतर्गत भाजपमध्ये नवखे असलेले आणि निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले "एटी' उर्फ अशोक तापीराम पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळते खासदार वसंतराव मोरे यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला. ए. टी. पाटील यांच्या विजयात शिवसेनेत नुकतेच स्थिरावलेले सुरेशदादा जैन यांच्या प्रभावाचा मोठा हिस्सा आहे. श्री. जैन यांचे जळगाव शहर- जळगाव ग्रामीण भागासह इतर तालुक्यांत मोठ्या संख्येत समर्थक आहेत. श्री. मोरे 18 महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करून विजयी झाले होते, तेव्हा जळगावचा हा भाग जुन्या एरंडोल मतदारसंघास जोडलेला नव्हता. ए. टी. पाटील व श्री. मोरे हे पारोळा या एकाच गावातील व तालुक्यातील असूनही तेथे ए. टी. पाटील यांचेच हितचिंतक जास्त असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे श्री. मोरे यांच्यासाठी व रावेर मतदारसंघात प्रचारासाठी तीन वेळा दौऱ्यावर आले. त्यांनी पहिल्यांदा आक्रमकपणे विचार मांडले. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर परखडपणे टीका केली. कॉंग्रेसच्या नाराज पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. कारण, जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्यामुळे पहिल्या टप्प्यात कॉंग्रेसची मनधरणी करण्यातच बराच वेळा गेला. कॉंग्रेस नेतेही शेवटपर्यंत रावेरच्या जागेसाठी हटून बसले होते. अखेर, दाखवायचे म्हणून कॉंग्रेसची मंडळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर आली. मात्र, जैन व एकनाथ खडसे यांच्या प्रचाराच्या झंझावातासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन, राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील व अरुण गुजराथी यांचे प्रयत्न कमकुवत ठरले. गेल्या अठरा महिन्यांत श्री. मोरे यांनी खासदार म्हण
ून निधी खर्चाचा बऱ्यापैकी पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नाही, हाही मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जिल्ह्यात जागावाटपात कॉंग्रेससाठी जागावाटपाचा ताळमेळ साधावा लागणार आहे.
जावळे यांना पुन्हा संधी
रावेर मतदारसंघातून युतीतर्फे भाजपचे मावळते खासदार हरिभाऊ जावळे 25 हजार मताधिक्याने विजयी झाले. येथे मराठा जातीचे कार्ड प्रभावी वाटत असताना जावळे यांनी मिळविलेला विजय हा त्यांचा व्यक्तिगत संपर्क, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार गिरीश महाजन यांचे वर्चस्व सिद्ध करणारा आहे. श्री. महाजन यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड. रवींद्र पाटील उमेदवार होते. श्री. पाटील यांची राजकीय कुवत मर्यादितच होती; पण त्यांचे मराठा असणे आणि या मतदारसंघात मराठा समाजाचे गठ्ठा मतदान असणे याचा काही मेळ घातला येईल का? याचाच विचार स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी केला होता. बहुतांशी तो विजयाच्या जवळ जाणारा होता, हे जावळे यांना मिळालेले कमी मताधिक्य दर्शविते. जावळे यांना केवळ लेवा पाटीदार समाजाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविणे, हे भाजपमधील काही नेत्यांनाही मान्य नव्हते; परंतु श्री. खडसे, पांडुरंग फुंडकर, श्री. महाजन, डॉ. राजेंद्र फडके, चैनसुख संचेती आदींनी घेतलेली मेहनत विजय निश्चित करून गेली. श्री. खडसे हे भाजपअंतर्गत राजकारण करताना पक्षाच्या राज्यस्तरावरील संघटनात्मक पदांवर लक्ष ठेवून आहेत. श्री. मुंडे यांच्यापाठोपाठ त्यांनाही महत्त्वाकांक्षा आहेच. रावेरसह जळगावची जागा परत मिळविल्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपची उमेदवारी देताना, तसेच शिवसेनेचे उमेदवार देतानाही खडसे- जैन संमतीचा प्रभाव राहणारच आहे.
जळगाव- रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंगेसला कॉंग्रेसची निष्क्रियता अपयशाकडे नेणारी ठरली. हा पराभव ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नाराज करणारा आहे. खानदेशात श्री. पवार यांचे आपल्याकडे मुक्कामी थांबणे किंवा आपल्या निवासस्थानी जेवण घेणे, अशा गोष्टींचे प्रचारासाठी भांडवल करणारे नेते आहेत. मात्र, या नेत्यांना अशा प्रभावाचे मतांमध्ये रूपांतर करता येत नाही, हे जळगाव महापालिका निवडणूक व आताच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. म्हणूनच, विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला नव्याने मांडणी करावी लागणार आहे.
Monday, May 4, 2009
ओम भवती भिक्षांदेही!

भारताचा चेहरा जगासमोर कसा आहे? हे घरबसल्या जाणून घेण्याचे इंटरनेट हे एक सोपे माध्यम. वेगवेगळ्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीतून भारत कसा आहे किंवा विभिन्न क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निरीक्षणातून भारताचे वर्णन व्यक्तिगत ब्लॉगमध्ये कशाप्रकारे नोंदले आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न भारताविषयी अनोखी माहिती समोर आणतो. आपलाच देश आपल्याला अनोळखी वाटू लागतो. मात्र, भिकारी- भिखारी आणि बेगर्स यांच्याविषयी इंटरनेटवर माहिती शोधत असताना "भारत हा भिकाऱ्यांचा देश आहे आणि तेथे भिकाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी पुढील टिप्स लक्षात ठेवा' असे जेव्हा वाचनात आले, तेव्हा अस्वस्थ झालो. त्याच मनःस्थितीत नोंदलेल्या इतरही माहितीचा या "दखल'मध्ये ऊहापोह
जळगावचे प्राध्यापक डॉ. सुनील मायी यांचे "आलो जन्मभरी मागाया' हे छोटेखानी पुस्तक साधारणतः सहा महिन्यांपूर्वी वाचनात आले. भिकाऱ्यांविषयी त्यांनी केलेल्या निरीक्षणांची नोंद त्यात आहे. भिकाऱ्यांचे तीन- चार इरसाल कॅरेक्टर लेखकाने उभे केले असून, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या सर्वच प्रकारच्या भिकाऱ्यांचे प्रातिनिधिक चित्रण त्यात आहे. वेगळ्या विषयावरील रंजक माहिती असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून संपले. त्यानंतर या विषयाचा विसर पडला. "भुसावळमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली' अशी बातमी तीन- एक महिन्यापूर्वी वाचनात आली. या भिकाऱ्यांमध्ये "गर्दूल्ले' जास्त आहेत, असाही संदर्भ होता. पुन्हा विषय स्मृतीबाहेर गेला.इंटरनेटवर विविध विषयांची माहिती शोधण्याची मला सवय आहे. एके दिवशी सहज भिकारी- भिखारी आणि बेगर्स हे शब्द गुगलवर ऑपरेट करून माहितीचा शोध घेतला. समोर आलेल्या वास्तवाने उडालोच. प्रवासी आणि पर्यटनाशी संबंधित अनेक वेबसाइटची यादी समोर आली. भिकारी आणि पर्यटनाचा काय संबंध? उत्सुकता वाढली. "भारतात पर्यटनाला जाता आहात?' असा प्रश्न करीत पर्यटकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याविषयी या वेबसाइटवर अनेक टिप्स दिलेल्या होत्या. त्यात "भारतातील भिकाऱ्यांपासून सावध!' असा इशारा नोंदलेला होता. इंडिया ट्रॅव्हल टिप्स, वर्ल्ड ऑफ इंडिया आणि इंडिया डॉट ट्रॅव्हल डॉट एजन्ट डॉट कॉमवर या टिप्स वाचता आल्या. या तिन्ही वेबसाइटवर भिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या पाच ते सात टिप्स होत्या. भारतात अपंग वृद्ध- महिला- मुले भीक मागतात. मात्र, काही देखावा करतात, उपाशी मुले दाखवून भीक मागणाऱ्या महिला असतात, वाहनातून उतरल्यानंतर लगेच काही देऊ नका, तर परत जाताना द्या, मुलांना भीक देताना भावनाशील होऊ नका; कारण त्यांचे पालकच त्यांना तसे करण्यास सांगतात. मुलांना रोख स्वरूपात भीक देऊ नका; कारण पालक ती हिसकावून घेतात. काही करावेसे वाटलेच तर स्वयंसेवी संस्थांना मदत करा, अशा अनेक टिप्स वाचनात आल्या. भारताच्या पर्यटनविषयक आणि सामाजिक चेहऱ्याचे विद्रुपीकरण या वेबसाइटच्या माध्यमातून कसे होत आहे? असा प्रश्न मनात निर्माण झाला. त्या वेळी प्रा. मायी यांच्या पुस्तकातील अनेक निरीक्षणे आठवली. मंदिर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाग-बगीचे अशा सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या भिकाऱ्यांची गर्दी आठवली. या ठिकाणांशी भारतीय पर्यटनस्थळे थेट संबंधित आहेत. त्यामुळे तेथे दिसणारा भारत वेबसाइटच्या माध्यमातून व्यक्त होतो, हे लक्षात आले. कामत डॉट कॉम या ब्लॉगवरही भिकाऱ्यांविषयी अशीच; मात्र भारतीय संस्कृतीचे चुकीचे दर्शन घडविणारी माहिती आढळून आली. लेखकाने अत्यंत अर्धवट माहितीवर निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो, "भारतात भिकारी परंपरेने तयार होतात. हिंदू साधू होण्यासाठी प्रथम भीक मागता आली पाहिजे'. ही माहितीसुद्धा चेहरा बिघडवणारीच वाटते.भारतातील तपस्वी, विद्वान साधू- महंतांच्या प्रतिमांना छेद देणारे हे लेखन अस्वस्थ करते. भारतीय संस्कृतीत "भिक्षा मागणे' हासुद्धा एक संस्कार आहे, याची माहिती कोणीतरी अशा अर्धवट लेखकांना द्यायला हवी. अध्ययन करणारा ब्रह्मचारी आणि सर्व सुखांकडे पाठ फिरविणारा संन्याशी यांना पोटापुरती भिक्षा मागण्याचा हक्क संस्कृतीने मान्य केला आहे. गुरुदक्षिणा देण्यासाठी विद्यार्थी, विवाह- यज्ञ किंवा आई- वडील यांच्या पोषणासाठीही भिक्षा मागणे योग्य मानले गेले आहे. आपले दैन्य घालविण्यासाठी राजा किंवा धनिकाकडे याचना करण्यासही संस्कृतीची मान्यता आहे. उपनयन संस्कार (मौंज) करताना आचार्यांनी बटूला ब्रह्मश्चर्याविषयी उपदेश केल्यानंतर मातेकडे बटूने भिक्षा मागण्याचाही संस्कार केला जातो. पहिल्या भिक्षेवरही आचार्यांचाच अधिकार असतो. भारतीय संस्कृतीदर्शनातील या बाबीही ठळकपणे समोर मांडल्या गेल्या पाहिजेत. याचा अर्थ या प्रथा- परंपरांचे समर्थन करण्याचा हा किंवा त्या योग्यच असल्याचा दावा करण्याचा येथे प्रयत्न नाही, हेही येथे स्पष्ट व्हावे. खरेतर भारतीय संस्कृती कोषात "भिक्षा' शब्दाची व्याख्या अत्यंत समर्पक शब्दांत दिली आहे. तेथे तर्कतीर्थ म्हणतात, "शरीर धडधाकट असूनही लोकांकडे अन्न, वस्र, पात्र, द्रव्य याची याचना करणे म्हणजे भिक्षा मागणे.'इंटरनेटवर "भिकारी' विषयावरील शोधमोहिमेत आणखी काही वेगळे संदर्भ आढळले. भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत 2007 मध्ये भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथे लाखभर भिकारी आढळले. त्यांपैकी चार पोस्ट ग्रॅज्युएट, सहा पदवीधर, 796 बारावी उत्तीर्ण होते. एकूणपैकी 799 पुरुष व 1541 महिला शारीरिकदृष्ट्या पूर्णतः धडधाकट होत्या. यातील काही भिकाऱ्यांचे रोजचे उत्पन्न (कमाई?) 500 रुपये होती.भिकाऱ्यांसंदर्भात अशीच एक आकडेवारी लक्ष वेधून गेली. 2004 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात नवी दिल्लीत 60 हजार, मुंबईत तीन लाख, कोलकात्यात 75 हजार, तर बंगळूरमध्ये 56 हजार भिकारी आढळले. हैदराबाद महानगराच्या बाबतीत असा निष्कर्ष आहे, की तेथे दर 375 माणसांच्या पाठीमागे एक भिकारी आहे... आता बोला. हीच गंमत मुंबईच्या संदर्भात आहे. 1996 मध्ये तेथे 20 हजार भिकारी होते. आज तेथे सहा लाख भिकारी आहेत. मुंबईत भिकाऱ्यांच्या माध्यमातून वार्षिक किती रुपयांची उलाढाल होते? याबाबतची आकडेवारीही राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे आणि तो आकडा आहे... 180 कोटी मात्र. सांगली पोलिस दरवर्षी भिकाऱ्यांसाठी दिवाळी साजरी करतात.काही श्रीमंत भिकाऱ्यांच्याही नोंदी आढळल्या. अहमदाबाद येथे एका भिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या झोपण्याच्या कापडात 44 हजार रुपये कॅश मिळाली होती. तेथेच भद्रकाली मंदिराजवळची एक भिकारी महिला नातवास खर्च करण्यासाठी रोज 50 रुपये देत होती. सारंगपूरच्या एक भिकाऱ्याने सामाजिक कार्यात सव्वा लाखाची देणगी दिली होती.हे सारे संदर्भ वाचताना गंमत वाटत होती. भिकारी हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केले, तरी विदेशी पर्यटकांना त्यांच्या रूपात भारताची ओळख होत आहे, याविषयी खेदही वाटत होता. पुन्हा प्रा. मायी यांच्या पुस्तकातील एक सूचना मार्गदर्शक वाटली. ती म्हणजे, महानगरांमध्ये भिकाऱ्यांसाठी "बेगर्स होम' उभारले गेले पाहिजेत. जळगावमध्येही या सूचनेवर महापालिका व स्वयंसेवी संस्थांनी वेगळा विचार करायला काय हरकत आहे?-------------------सदराशी संबंध नसलेली गोष्टएका आयटी कंपनीच्या समोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यास त्या कंपनीतील बडा अधिकारी 50 रुपयांची नोट देत असे. भिकारी त्याला हसून नमस्कार करायचा. काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्याने 50 ऐवजी 20 ची नोट देणे सुरू केले. भिकारी ती नोट घ्यायचा आणि केवळ स्मित करायचा. पुन्हा काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्याने त्या भिकाऱ्यास 10 रुपयांची नोट देणे सुरू केले. त्यावर निर्विकारपणे भिकारी त्या अधिकाऱ्यास म्हणाला, "महाशय, आपण काही अडचणीत आहात का? आपण मला कमी रकमेची नोट देत आहात?' तो अधिकारी म्हणाला, "होय, पूर्वी माझे खर्च कमी होते. आता, माझा मोठा मुलगा उच्चशिक्षणाला गेला म्हणून मी 50 ऐवजी 20 रुपये देत होतो. त्यानंतर मुलगी कॉलेजात गेली. तिचा खर्च वाढला म्हणून मी तुला 10 रुपये देत आहे.' तो भिकारी निर्विकारपणे म्हणाला, "तुम्हाला अजून तिसरे मूल आहे का?' अधिकारी म्हणाला, "होय, एक लहान मुलगा आहे.' त्यावर भिकारी परखडपणे म्हणाला, "महाशय, या तिसऱ्या मुलाचे शिक्षण मला देण्याच्या रकमेतून कृपया करू नका.'
Saturday, May 2, 2009
मुद्दा 49 अंश तापमानाचा !

अत्याधुनिक तंत्रज्ञान ः अत्यंत संवेदनशिल नोंदीजळगावमध्ये तापमानाचा पारा अखेर 49 अंश सेल्सिअसच्या वर गेला. काल (ता.29) दुपारी एक वाजून 16 मिनीटांनी जळगावमधील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 49.2 अंस सेल्सिअस नोंदले गेले. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात "सकाळ' च्या माध्यमातून पोचली. "इ सकाळ' च्या माध्यमातून जगभर पोचली. आज (ता. 30) या बातमीविषयी संपूर्ण महाराष्ट्रातून जळगावकरांना विचारणा व्हायला लागली. त्यात कुतूहल, जिज्ञासा, चिंता आणि उपहास असा अनेक भावनांचे मिश्रण अनुभवाला आले. यातूनच मुद्दा 49 अंश तापमानाचा समोर आला. एक बाब प्रथम स्पष्ट करायला हवी ती म्हणजे, जी मंडळी ही ऐतिहासीक नोंद लोकांच्यापर्यंत पोचवू शकले नाहीत, त्यांनी या मुद्याचा उलटा प्रवास सुरू केला. हे कसे शक्य आहे ? लोक कसे राहू शकतील ? ज्यांनी हे नोंदले किंवा सांगितले त्यांच्या तंत्रज्ञानाविषयी शंका असावी ? असेही मुद्दे समोर आले.49.2 अंश तापमानाची नोंद ही रस्त्यावरच्या कोणत्याही संस्थेने केलेली नाही. जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या जैन उद्योग समुहाच्या ग्रीनहाऊसमधील अत्याधुनिक यंत्रणेच्या संगणक मापनावर ही नोंद झाली आहे. सर्वाधिक तापमानाची ही नोंद केवळ 15 मिनीटांसाठी आहे. 1 वाजून 02 मिनीटाला तापमान 47 अंश, 1 वाजून 17 मिनीटाला 49.02 आणि 1 वाजून 32 मिनीटाला पुन्हा 48 अंश सेल्सिअस अशी नोंद आहे.जळगाव शहरात अजून दोन वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तापमानाची नोंद केली जाते. तेथे वापरल्या जाणाऱ्या पद्धतीविषयी शंका घेण्याचे कारण नाही. किंवा त्यांचीच पद्धत खरी असे कोणीही छाती टोकून सांगू शकत नाही. आता मुद्दा हा आहे की, जैन उद्योग समुहातील ग्रीन हाऊसमधील नोंद कितपत विश्वासार्हा मानावी ?जैन उद्योग समुहाचे शेती संशोधन केंद्र मोहाडी रस्स्यावरील जैन हिल्स परिसरात आहे. तेथे उतीसंवंर्धन केंद्रात विविध पिकांच्या रोपांसाठी ग्रीनहाऊस उभारले आहे. या ग्रीन हाऊसमधील तापमान कमाल आणि किमान 27 सेल्सिअस ठेवावे लागते. सापेक्ष आर्द्रता 70 टक्के असावी लागते. म्हणजे रोजच तापमान नोंदविणे व ते नियंत्रणात ठेवण्याचे काम. पूर्वी केवळ ग्रीन हाऊसमधील तापमानाची नोंदणी आणि निरीक्षण केले जात होते. यात सूर्याच्या किरणांची प्रखरता, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान याच्या नोंदी केल्या जातात. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. भवरलाल जैन यांनी बाहेरील तापमानाच्या नोंदीसाठी डिसेंबर 2002 मध्ये अमेरिकन तंत्रज्ञान असलेली संगणक प्रणाली मागविली. आपल्या भागातील शेतकऱ्यांना तापमानाचे निष्कर्ष देता यावेत हीच त्या मागची भावना होती. अर्थात बारमतीच्या प्रतिभा प्रतिष्ठानमध्ये ज्या प्रणालिचा उपयोग केला जातो तिच ही प्रणाली.वॉचडॉग ही अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीने सूर्याच्या किरणांची प्रखरता, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान नोंदविण्यासाठी स्पेक्ट्रम सिस्टिम विकसीत केली आहे. ग्रीन हाऊसच्या बाहेर सेन्सर लावण्यात आला आहे. त्याला प्रती 20 मिनीटांचा अवधी देत तापमान नोंदविण्याची सोय केली आहे. या सर्व नोंदी संगणक करतो. माणूस नाही. या सेन्सरजवळ नेहमीचे तापमापकही जोडलेले आहे.काल (ता. 29) याच सेन्सरच्या संवेदशिलतेवरुन 49.02 अंश सेल्सिअसची नोंद झाली. या साऱ्या माहितीचे विश्लेषण करणारी व्यक्ती कोण आहे ? त्या आहेत कल्याणी किरण मोहरीर. त्यांचे शिक्षण बीएस्सी बॉटनी, एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी. कामाचा अनुभव 1996 पासून याच ग्रीन हाऊसमध्ये वातावरणाच्या, तापमानाच्या बदलाच्या नोंदी करणे त्या अभ्यासणे. आता हे सारेच विश्वासार्हा असल्यावर अविश्वास ठेवणार कोण ? आहेत काही जण. त्यापैकी एक शासकीय यंत्रणा. जिच्याकडे कोणत्याही अत्याधुनिक सोयी- सुविधा नाहीत अशी अधिकारी- कर्मचारी मंडळी. बरे, तापमान अधिकच वाढले म्हटल्यावर वेगळ्या मागण्या पुढे येवू नयेत ही प्रशासन प्रमुखाला चिंता. वाढीव तापमानामुळे दुष्काळाच्या तीव्रतेचा लाभ घेण्याची प्रवृत्ती वाढू नयेही, ही सुद्दा चिंताच. आणि काही जणांना वृत्त चुकल्याची चिंता. म्हणूनच, थेट सारे समाजून घेण्याचा आणि वाचकांच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न केला. (या विषयाच्या संदर्भात कोणाकडेही काहीही शास्त्रशुद्ध माहिती असल्यास "सकाळ"कडे पाठवा. किंवा तेट बोला 9881099189 वर)जगाच्या पाठीवरही नोंदजळगावच्या काल (ता.29) च्या तापमानाची नोंद जगाच्या पाठीवरही झालेली आहे. ही नोंद योग्य असल्याचा हा दुसरा पुरावा. जगभरातील हवामानाचा, वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या अनेक संस्था आहेत. उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीवरून सध्याचे वातावरण आणि पुढील 24 तासाचे वातावरण या विषयी या संस्था अंदाज देतात. या पैकीच एक असलेल्या ऍक्युव्हेदर डॉट कॉम या संस्थेच्या वेबसाईटवरही कालचे जळगावचे तापमान 49 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. या वेबसाईटवर हवामानाशी संबंधित अनेक बाबी आपण पाहू शकतो. येथे एक उलेल्ख करावा लागेल. तो म्हणजे चार वर्षांपूर्वी पाऊस कृत्रिम पद्धतीने पाडण्याचा प्रकल्प वर्षा हा प्रयोग शेगाव (जि. बुलडाणा) येथून राबविला जात होता. त्यावेळी "व्हेदर मॉडिफिकेशन' याच वेबसाईटवर उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ढगांच्या छाचित्रावरुन अंदाज घेत किमान पाचहाजर फूट उंचावर हेलिकॉप्टर पाठवून पुरेसे बाष्प असलेल्या ढगांमध्ये (काळे ढग) द्रावण फवारून कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडला जात होता. (कृत्रिम पाऊस नाही. पाऊस खराच मात्र, तो पाडण्याची पद्धत मानवी...कृत्रिम)
Subscribe to:
Posts (Atom)
