Saturday, January 27, 2018
Friday, January 26, 2018
जलक्रांती घडविणारे भोणे ...
पाणी अडवा पाणी जिरवा या मूळ संकल्पनेवर आधारित अनेक सरकारी योजना आल्या. गाव आणि शेत शिवारापर्यंत पोहचल्या. काहींचा गवगवा झाला. काही नावाला सुरु राहिल्या. बहुतेक आल्या कधी आणि गेल्या कधी समजले नाही. सरकारी खर्चही भरपूर होवून फारसा परिणाम काही साध्य झाला नाही. मागील वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेचा बोलबाला आहे. काही गावांमध्ये काम होते आहेत. काही ठिकाणी देखावा सुध्दा आहे.
Thursday, January 25, 2018
नाथाभाऊ, आता भाजप सोडाच!
संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा चेहरा मोहरा म्हणून स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या नंतर एकनाथराव खडसे आणि नितीन गडकरी यांच्या चेहऱ्यांकडे पाहिले जात होते. महाजन, मुंडे दोघेही अकाली गेले. त्यांच्या नंतर राज्यातील सत्तास्थाने गडकरी, खडसे भोवती काही काळ होती. यापूर्वी केंद्रात भाजप आघाडी आणि राज्यात युतीची सत्ता असताना गडकरींना दोन्ही ठिकाणी मंत्रीपद मिळाले होते. खडसेही पहिल्यावेळी जरा उशिरानेच मंत्री झाले होते. आता केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप आघाडीचे सरकार असून गडकरी मंत्रीपद उपभोगत आहेत. राज्यातही भाजप नेतृत्वातील युतीचे सरकार असून खडसेंना मात्र सत्तेच्या बाहेर सक्तीने बसवले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)