Sunday, August 29, 2010

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा




त्र्यंबकेश्‍वरला श्रावणातील तिसर्‍या सोमवारच्या ब्रह्मतगरी प्रदक्षिणेला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी एकलाखावर भाविक या खडतर प्रदक्षिणेत सहभागी होतात.
श्रावण महिन्यात दर सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्यासाठी बाविक गर्दी करतात. पुण्यदायी, मोक्षाकडे सन्मार्गाकडे नेणारी प्रदक्षिणा म्हणून बाविकांचा समज आहे. ‘भोलेहरऽऽऽ’च्या जयघोषाने त्र्यंबक परिसर दुमदुमला जातो. दरवर्षी सुमारे लाखावर भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. ही प्रदक्षिणा करण्याची परंपरा अतिप्राचीन आहे. सातशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्तीनाथ महाराज व संत ज्ञानेश्‍वर, सोपान, मुक्तबाई यांनी प्रदक्षिणा करून जगाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सन्मार्ग सांगितला. त्याच मार्गाने आजही जनतेची वाटचाल सुरू आहे.
या प्रदक्षिणेत वृद्धांचा मोठा सहभाग असतो. यात सहभागी होणारे 75 टक्के भाविक असले तरी 25 टक्के मंडळी सहल म्हणून प्रदक्षिणा करतात. 80 टक्के भाविक नेहमी येणारे असतात तर तर 20 टक्के भाविक दरवर्षी नव्याने येतात.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पंचलिंग पट्ट्यात पर्वतराज ब्रह्मगिरी असून या पर्वतावरुनच पवित्र गोदामाईचा उगम झाला आहे. पंचलिंग डोंगरातून पाच नद्यांचा उगम झाला आहे. यात अहिल्या, गोदावरी, त्र्यंबकेश्‍वरी संगम घाटात दृष्टीत पडतात तर बाणगंगा वैतरणा यांचा संगम धाडोशीनजीक गणपती मंदिराजवळ दृष्टीस पडतो. येथे स्नान करून प्रदक्षिणार्थी पुढची वाटचाल करतात.
गोदावरीने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केले. पंचनद्यांनी इगतपुरी पट्टा हरित केला. वैतरणा नदी, धरण मुंबईकरांसाठी जीवनदायी ठरली. गोहत्येचे पातक नष्ट करण्यासाठी महर्षी गौतमांनी येथे प्रदीर्घ तपश्‍चर्या केली व गंगेला शिवशंकराच्या जटेतून भूलोकी आणलेे. अशा रितीने गोदावरीचा उगम झाला. श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्‍वर, सोपान, मुक्ताई हे चौघे भावंड प्रदक्षिणा करीत असतांना वाटेत त्यांच्या पाठीमागे वाघ लागल्याने जंगलात या भावंडांची ताटातूट झाली. संत निवृत्तीनाथ बचाव करण्यासाठी गुरू गहिनीनाथांच्या गुहेत शिरले. तिथेच संत निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दिक्षा गहिनीनाथांनी दिली. धर्माचे (आजच्या भागवत व वारकरी संप्रदाय) जनकल्याणाचे कार्य संत निवृत्तीनाथांनी केले. या पौराणिक कथेनुसार ब्रह्मगिरी प्रदक्षिणा निराकार भावनेतून करावी. परमेश्‍वर व निसर्गाशी एकरुप व्हावे. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, सर्व समाजाने एकत्र येऊन धार्मिक वृत्ती जोपासून देशचे कल्याण करावे. ही उदात्त शिकवणही प्रदक्षिणा देते. ‘त्र्यंबक महात्म्य व त्र्यंबकराज निवृत्ती विजय’ या ग्रंथात प्रदक्षिणेचे महत्त्व वर्णिलेले आहे. पेशवे काळात गुन्हेगारांना शिक्षा म्हणून उपप्रदक्षिणा घालण्यास सांगितले जात असे.
कुशावर्तावरून प्रदक्षिणेला ब्रह्ममुहूर्तावर प्रारंभ करावा. प्रयागतीर्थ, पहिणे बारी, भिलमाळ, कोजुर्ण धाडोशी गांवावरुन तेथे उजव्या हाताने वळण गौतमाचा धस (गौतमाचे मंदिर) तळेगांव धरणाजवळून नमस्कार, सापगांव शिवार, गणपत बारी, पुन्हा त्र्यंबकेश्‍वर असा छोट्या प्रदक्षिणेचा मार्ग आहे. ब्रह्मगिरी, गंगाद्वार, नीलपर्वत, पंचलिंंग डोंगर, गौतम धस, लग्नस्तंभ डोंगर, दुर्गा भांडार, मेटघेर किला अशा डोंगरांनाही प्रदक्षिणा होते. रामतीर्थ, बहुतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, भागिरथी तीर्थ, अंकुर तीर्थ, भुजंग तीर्थ, नरसिंहतीर्थ इ. तीर्थ मंदिरे प्रदक्षिणा मार्गात लागतात व हे अंतर 24 कोसाचे आहे. धाडोशीच्या नवीन पुलावरुन अथवा सामुंडी गावावरुन मासळी घाट, हर्षेवाडी डोंगर, यात हरीहर डोंगर किल्ला यात नागमोडी रडकुंडी यामार्गावर मोठी प्रदक्षिणा केली जाते.
हरीहर पायथ्यानजीक मोठे सरोवर आहे. पुढे लेकुरवाळी देवीपर्यंत यावे लागते. या प्रदक्षिणा मार्गात विविध 108 तीर्थ लागतात. शेवाळावरुन चालणे, नितळ थंड पाण्यात स्नान करणे, धुक्यात वाटचाल तर नागमोडी व रडकुंडी येथे विषववृत्तीय जंगलाची अनुभूती, सूर्यदर्शन जवळपास नाही, अशा अवर्णनीय वातावरणात मोठी प्रदक्षिणा करण्यात येते. यासाठी गाईड अथवा जाणकार सोबत हवा. निसर्ग फेरी करा, निसर्गाशी एकरुप व्हा व ईश्‍वराचे लाभ स्मरण करून जीवन समृद्ध करा अशी शिकवण या प्रदक्षिणेतून मिळते. हर हर गंगे ऽऽऽ असा गगनभेदी जयघोष मोठ्या प्रदक्षिणेत केला जातो. ही प्रदक्षिणा करताना तुमच्या सादाला निसर्ग प्रतिसाद देतो याचा अनुभव येईल.

Wednesday, August 25, 2010

काश्मिरातील उलटे वारे !


काश्मिरात फुटीरतावाद्यांनी उच्छाद मांडला आहे. पाकिस्तानच्या अप्रत्यक्ष चितावणी व पैशांच्या पुरवठ्यावर या मंडळींनी काश्मिरी जनतेला वेठीस धरले आहे. रोज हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, बंद यामुळे तेथील सर्वसामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. कोणत्याही अन्यायकारक दडपशाहीचा चिमटा जेव्हा सामान्य लोकांच्या पोटाला पीळ टाकतोे तेव्हा तेथे बंडखोरीची ठिणगी पेट घेते. काश्मिरमध्ये आता हे घडू लागले असून सर्वसामान्यांच्या मनांत बंडखोरीची ठिणगी पेटली आहे. गेल्या दोन- तीन महिन्यांपासून फुटीरतावाद्यांनी लादलेल्या अन्यायाच्याविरोधात तेथील स्थानिक लोक फुटीरतावाद्यांवर दगडफेक करु लागले असून त्यांच्या समर्थकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्यादही दाखल होवू लागल्या आहेत. काश्मिरमधील हे वारे उलटे वाहू लागले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या गेल्या 63 वर्षांमध्ये काश्मिरीजनतेची सातत्याने होरपळ होते आहे. आम्ही काश्मिरी, आम्ही भारतीय, आम्ही पाकिस्तानचे समर्थक, आम्ही स्वायत्त की आम्ही कोणीच नाही असे स्वत्त्वाविषयीचे अनेक प्रश्‍न काश्मिरी जनतेला भेडसावत आहेत. आतापर्यंत पाकिस्तानच्या चिथावणीवर फुटीरतावाद्यांनी काश्मिरची राखरांगोळी करण्यातच धन्यता मांडली. कुठे हल्ला, कुठे घुसखोरी, कुठे गोळीबार, कुठे स्फोट असा प्रकारांनी काश्मिरची होरपळ होतेच आहे. या सार्‍या प्रकाराकडे काश्मिरी जनताही तस्थपणेच पाहात राहीली. अन्यायाविरुद्ध गप्प राहणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अन्याय करणार्‍याचे किंवा त्याच्या विचारांचे समर्थन करणे हेही व्यावहारीक सूत्र आहे. पाकिस्तान त्याचाच लाभ घेत काश्मिरमधील मुठभर फुटीरांच्या संघर्षांला स्थानिकांचाच लढा असे म्हणत आला आहे. आंतराष्ट्रीय जन सुदायासमोरही तशी मखलाशी त्याने वारंवार केली आहे. काश्मिरीजनतेने आजपर्यंत कधीही उडपणे फुटीतरवाद्यांना विरोध केला नाही किंवा त्यांच्या मागण्यांना समर्थनही दिलेले नाही. काश्मिरीजनतेला स्वायत्तताही हवी की नको हा विषय गुलदस्त्यात आहे. अर्थात या मागे भारत सरकारचे काश्मिरबाबत धरसोड धोरण हेही कारणीभूत आहे. मंगळवारी काश्मिरात घडलेल्या काही घटनांनी मात्र यिोग्य प्रकारे योग्य प्रकारे फुटीरतावाद्यांना खोर्‍यातून पिटाळून लावण्याचा निर्धार केलेला दिसत आहे. काश्मिर खोरे बंद करण्याचा प्रकत्न करणार्‍या फुटीरतावाद्यांवर तेथील दुकानदार व सामान्य जनतेने दगडफेक केली. एवढेच नव्हेतर काही फुटीरतावाद्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदविला. काश्मिरीजनतेच्या या बदलत्या मानसिकतेला विधायक सहकार्याची जोड तेथील राज्य प्रशासन, सुरक्षा दल आणि केंंद्रीय प्रशासनाने द्यायला हवी. यापूर्वीही काश्मिरातील धाडसी महिलांनी घरात घुसलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेले आहे. अशा बाबींचा योग्य प्रकारे लाभ उठवीत भारताच्या नंदनवनात शांतता व सुव्यस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काश्मिरीजनतेचा पाठींबा हवा असेल तर आता तेथे फुटीरतावाद्यांच्या विरोधातील हातांना केंद्र सरकारच्या मदतीचा हात मिळायला हवा.

Tuesday, August 24, 2010

मंगळागौरीचे व्रत


श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.असे करतात मंगळागौरीचे व्रत:- आता मंगळागौरीच्या व्रताविषयी माहिती घेऊ. नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं. लग्न झाल्यापासून पुढील पाच वर्षे ही पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी माहेरी आणि सासरी एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते. ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई, जुई, मोगरा, गुलाब अशा फुलझाडांच्या पत्रीही वाहिल्या जातात. अत्तर अन् काजळही लावले जाते. नंतर दागिने घातले जातात. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते धातूचे अथवा मण्यांचे नसतात. कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून दागिने तयार केले जातात. या दागिन्यांद्वारे देवीला शृंगारण्यात येते. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यासाठी सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरली जातात. त्यानंतर या देवीचे जागरण केले जाते. त्यासाठी आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. जागरणाची धमाल:- फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्‍या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.
श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.असे करतात मंगळागौरीचे व्रत:- आता मंगळागौरीच्या व्रताविषयी माहिती घेऊ. नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं. लग्न झाल्यापासून पुढील पाच वर्षे ही पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी माहेरी आणि सासरी एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते. ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई, जुई, मोगरा, गुलाब अशा फुलझाडांच्या पत्रीही वाहिल्या जातात. अत्तर अन् काजळही लावले जाते. नंतर दागिने घातले जातात. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते धातूचे अथवा मण्यांचे नसतात. कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून दागिने तयार केले जातात. या दागिन्यांद्वारे देवीला शृंगारण्यात येते. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यासाठी सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरली जातात. त्यानंतर या देवीचे जागरण केले जाते. त्यासाठी आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. जागरणाची धमाल:- फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्‍या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.



















































Friday, August 20, 2010

चला त्र्यंबकेश्वरला !!


श्रावणाचा महिना. अधुनमधून पडणार्‍या सरी. मध्येच ढगाआडून डोकावणारा सूर्य. सह्याद्रीनेे लपेटलेला हिरवा शालू. पावसामुळे न्हाऊन निघालेल्या वृक्षांना आलेली नवी पालवी- तजेली. डोंगराच्या उतारावरून खळाळणारे झरे, दरीत कोेसळणारे धबधबे. अशा प्रसन्न आणि रोमांचित करणार्‍या वातावरणात छोटा ट्रेक आणि जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर चला त्र्यंबकेश्वरला. सध्या येथे मस्त माहौल आहे...
नाशिकची थंडी, नाशिकचा पाऊस कधीतरी अनुभवावा. इगतपुरी घोटी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचे घुमशान काय असते ? हे अनुभवता येते. धुवांधार कोसळणारा पाऊस. सात- आठ हजार फुट उंचावरील डोंगरांच्या रांगा. बाष्ष घेऊन जाणारे काळे ढग. त्यात भटकंती करतानाच ओले होणारे कपडे. हे सारे सारे वेगळ्याच विश्वात नेणारे. त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी असो की अंजेनेरीचा अंजनीगड. तेथून परतावे असे वाटतच नाही. बहुधा स्वर्ग असावा तर तो असाच...
त्र्यंबकेश्वर... ब्रह्मा- विष्णू- महेशाच्या निवासाचे स्थान. संतांची भूमी. निवृत्तीनाथ महाराजांचे समाधीस्थळ. कुंभमेळ्याचे पवित्र स्थान. विविध साधू- महंतांच्या आखाड्याचे स्थान. असे काय काय वर्णन करावे ?
नाशिकपासून अवघ्या 28 किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर आहे. (नाशिकरोड रेल्वेस्थानकापासून 38 किलोमीटरवर) येथे 12 पैकी एक असलेले त्रंबकेश्वराचे ज्योतिलिर्ंंग आहे. त्यात ब्रह्मा- विष्णू- महेशाचे रुप पाहात येते. महेशाचे हे मंदिर पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. तेथे दिवसातून 4 वेळा पूजा केली जाते.
येथे पवित्र कुशावर्त तीर्थ आहे. समुद्र मंथनाच्यानंतर निघालेल्या अमृत कुंभातील अमृताचे काही थेंब या कुंडात पडल्याच्या अख्यायिका आहेत. त्यामुळेच येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याच्या शाहीस्नान पर्वणीच्यावेळी येते भल्या पहाटे सशस्र नागा साधुंच्या मिरवणुका निघतात. पवित्र दक्षिणगंगा तथा गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर परिसरात होतो. तेथून ती नाशिककडे वाहते. येथे गोदावरी- अहिल्यानदीचा संगम आहे. तेथे कालसर्प योेगाशी संबंधित नारायण नागबळी विधी होतात.
त्र्यंबकेश्वर परिसरात भटकंतीच्या अनेक जागा आहेत. ब्रह्मगिरीचे फेरी हा स्वर्गिय आनंद देणारा प्रकार. गंगाद्वार, बिल्व तीर्थ, गौतम तीर्थ, इंद्र तीर्थ, अहिल्या संगम, नील पर्वत, निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर येथे आहेत. येथे डोंगर प्रदक्षिणेचे दोन मार्ग आहेत एक ब्रम्हगिराली प्रदक्षिणा आणि दुसरी हरिहरगिरीला प्रक्षिणा.
जाणार कसे ?
विमानाने - नाशिकचे विमानतळ (तेथून त्र्यंबकेश्वर 39 किलोमीटर)
रेल्वेने - नाशिकरोड रेल्वेस्थानक (तेथून त्र्यंबकेश्वर 38 किलोमीटर)
रस्त्याने -मुंबई- त्र्यंबकेश्वर 180 किलोमीटर, पुणे- त्र्यंबकेश्वर 200 किलेमीटर
निवास - नाशिकला मुक्कामासाठी चांगल्या हॉटेल्स आहेत. धर्मशाळांमध्येही उत्तम व्यवस्ता होते.

पोरचेष्टांचे बक्षीस


भारतीय संसदीय कार्यप्रणालीचे आधारस्तंभ असलेल्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचे दारिद्रय एका फटक्यात दूर करणारा ऐतिहासीक निर्णय शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. खासदारांचे दरमहा वेतन आता 16 हजार ऐवजी 50 हजार रुपये झाले आहे. याशिवाय इतर भत्तेही वाढले आहेत.


या सार्‍या वेतनवाढीची एकत्रित बेरीज केल्यास ती 300 पट होते. स्वतंत्र भारतात आजपर्यंत एवढी वेतनवाढ कोणत्याही कामगार, कर्मचारी किंवा लोकसेवकांना मिळालेली नाही. खासदारांचे वेतन वाढविण्यावर गेल्या कित्येकवर्षानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले होते. गेल्या आठ महिन्यांपासून महागाईचा निर्देशांक सातत्याने वाढत असून सामान्य जनता महागाईत होरपळत आहे. त्याकडे सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष नाही मात्र, महागाईची झळ खासदारांना सोसवेना म्हणून वेतनवाढ करण्यावर सार्‍यांचे एकमत झाले. खासदारांची वेतनवाढ 80 हजार करण्याची शिफारस संसदीय समितीने मंत्रीमंडळाकडे केली होती. एवढी वेतनवाढ करण्यास मंत्रिमंडळाने विरोध करून ती 50 हजार रुपयांवर आणली. अखेर सभागृहात त्यानुसार ठराव मांडून तो आवाजी मतदानाने मंजूरही झाला. येथे विरोधकांनी ओंगळवाणे प्रदशर्र्न करीत वेतनवाढ 80 हजार रुपये करण्याची मागणी लावून धरली. ती सत्ताधारी गटाने फेटाळून कामकाज गुंडाळले. त्यानंतर संपूर्ण जगाने भारतीय संसदेतील पोरकट चाळे पाहिले. उत्तरप्रदेश, बिहार किंवा मध्यप्रदेशात नौटंकी हा करमणूक प्रधान कार्यक्रम लोककलावंत सादर करतात. तशीच नौटंकी लोकसभेच्या सभागृहात रंगली. लहान मुले डॉक्टर- डॉक्टर किंवा चोर- पोलिस असा लुटूपुटू खेळ खेळतात. तसा खेळ लालुप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव व गोपिनाथ मुंडे यांनी खेळला. खासदारांचे वेतन 60 हजार ऐवजी 80,001 करावे या मागणीसाठी या तिघांच्या नेतृत्वात पीएम- स्पिकर खेळ मांडण्यात आला. औटघटकेचे पंतप्रधानपद लालुंनी स्विकारले, मुंडे स्पिकर झाले तर मुलायम सल्लागार. या प्रती सरकाने मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील सरकार बरखास्त केले आणि आपल्या अधिकारात खासदारांची वेतनवाढ मंजुरीचा ठराव टाकला. एखाद्या साखर काखानास्थळी किंवा सहकारी संस्थेत वार्षिक किंवा विशेष सभा आटोपती घेतल्यानंतर मूठभर विरोधक प्रती सभा घेण्याचा जसा घोळ घालतात अगदी तसाच हा पोरखेळ रंगला. विरोधकांनी महागाईत होरपळणार्‍या सर्वसामान्यांचा विचार करुन वेतनववाढीली विरोधाची भूमिका घ्यायला हवी होती. तसे न करता त्यांनी स्वार्थासाठी संसदेचे सभागृह वापरले. दारिद्रय रेषेखालील भारताची 40 टक्के लोकसंख्या असहाय्यपणे ही नौटंकी पााहत होती. खासदारांचं बेसिक 16 हजारांवरून एकदम 50 हजार रुपये झाले आहे. तरी सुद्धा गरीब नाशुष असल्याचे विदारक दृश्य दिसत होते. केंद्रीय सेवेतील सचिवापेक्षा जास्त वेतनवाढ हवी अशी मागणी करणार्‍या खासदारांच्या कामगगिरीच्या मुल्यमापनाच्या निकषावर मात्र कोणीही बोलले नाही. किती खासदार चर्चेत भाग घेत नाहीत, किती मौनी आहेत, किती जण केवळ भत्ते घेतात अशा प्राथमिक प्रश्‍नांचा ऊहापोह कोणीही केला. लोकशाहीच्या नावाने सार्‍यांनी स्वत:चे चांगभले केले. खासदारांच्या कार्यालयीन खर्चासाठी आता दरमहा 20 हजाराऐवजी 40 हजार रुपये दिले जाणार आहेत. खासदारांना वाहन खरेदीसाठी आत्तापर्यंत अल्प व्याजदराने 1 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जात होते , ते आता 4 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. खासदारांना सरकारी कामासाठी प्रवास करावा लागला तर त्यांना 16 रुपये प्रती किलोमीटरनुसार भत्ता दिला जाईल. सध्या तो 13 रुपये प्रती किलोमीटर आहे. खासदारांच्या पत्नीवरही सरकार प्रसन्न झाले आहे. त्यांना फर्स्ट क्लास किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासने कुठेही कितीही मोफत प्रवास करता येणार आहे. सेवानिवृत्ती वेतनातही तब्बल 12 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या दरमहा 8 हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन दिलं जाते. ते 20 हजारावर जाणार आहे. ही आकडेवारी पाहता कोण म्हणेल भारताची लाकेशाही व अर्थव्यवस्था दुबळी आहे ?महिन्यांपासून महागाईचा निर्देशांक सातत्याने वाढत असून सामान्य जनता महागाईत होरपळत आहे. त्याकडे सत्तााधारी आणि विरोधकांचे लक्ष नाही मात्र, महागाईची झळ खासदारांना सोसवेना म्हणून वेतनवाढ करण्यावर सार्‍यांचे एकमत झाले. खासदारांची वेतनवाढ 80 हजार करण्याची शिफारस संसदीय समितीने मंत्रीमंडळाकडे केली होती. एवढी वेतनवाढ करण्यास मंत्रिमंडळाने विरोध करून ती 50 हजार रुपयांवर आणली. अखेर सभागृहात त्यानुसार ठराव मांडून तो आवाजी मतदानाने मंजूरही झाला. येथे विरोधकांनी ओंगळवाणे प्रदशर्र्न करीत वेतनवाढ 80 हजार रुपये करण्याची मागणी लावून धरली. ती सत्ताधारी गटाने फेटाळून कामकाज गुंडाळले. त्यानंतर संपूर्ण जगाने भारतीय संसदेतील पोरकट चाळे पाहिले. उत्तरप्रदेश, बिहार किंवा मध्यप्रदेशात नौटंकी हा करमणूक प्रधान कार्यक्रम लोककलावंत सादर करतात. तशीच नौटंकी लोकसभेच्या सभागृहात रंगली. लहान मुले डॉक्टर- डॉक्टर किंवा चोर- पोलिस असा लुटूपुटू खेळ खेळतात. तसा खेळ लालुप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव व गोपिनाथ मुंडे यांनी खेळला. खासदारांचे वेतन 60 हजार ऐवजी 80,001 करावे या मागणीसाठी या तिघांच्या नेतृत्वात पीएम- स्पिकर खेळ मांडण्यात आला. औटघटकेचे पंंतप्रधानपद लालुंनी स्विकारले, मुंडे स्पिकर झाले तर मुलायम सल्लागार. या प्रती सरकाने मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील सरकार बरखास्त केले आणि आपल्या अधिकारात खासदारांची वेतनवाढ मंजुरीचा ठराव टाकला. एखाद्या साखर काखानास्थळी किंवा सहकारी संस्थेत वार्षिक किंवा विशेष सभा आटोपती घेतल्यानंतर मूठभर विरोधक प्रती सभा घेण्याचा जसा घोळ घालतात अगदी तसाच हा पोरखेळ रंगला. विरोधकांनी महागाईत होरपळणार्‍या सर्वसामान्यांचा विचार करुन वेतनववाढीली विरोधाची भूमिका घ्यायला हवी होती. तसे न करता त्यांनी स्वार्थासाठी संसदेचे सभागृह वापरले. दारिद्रय रेषेखालील भारताची 40 टक्के लोकसंख्या असहाय्यपणे ही नौटंकी पााहत होती. खासदारांचं ‘बेसिक’ 16 हजारांवरून एकदम 50 हजार रुपये झाले आहे. तरी सुद्धा ‘गरीब’ नाशुष असल्याचे विदारक दृश्य दिसत होते. केंद्रीय सेवेतील सचिवापेक्षा जास्त वेतनवाढ हवी अशी मागणी करणार्‍या खासदारांच्या कामगगिरीच्या मुल्यमापनाच्या निकषावर मात्र कोेेणीही बोलले नाही. किती खासदार चर्चेत भाग घेत नाहीत, किती मौनी आहेत, किती जण केवळ भत्ते घेतात अशा प्राथमिक प्रश्‍नांचा ऊहापोह कोणीही केला. लोकशाहीच्या नावाने सार्‍यांनी स्वत:चे चांगभले केले. खासदारांच्या कार्यालयीन खर्चासाठी आता दरमहा 20 हजाराऐवजी 40 हजार रुपये दिले जाणार आहेत. खासदारांना वाहन खरेदीसाठी आत्तापर्यंत अल्प व्याजदराने 1 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जात होेते , ते आता 4 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. खासदारांना सरकारी कामासाठी प्रवास करावा लागला तर त्यांना 16 रुपये प्रती किलोमीटरनुसार भत्ता दिला जाईल. सध्या तो 13 रुपये प्रती किलोमीटर आहे. खासदारांच्या पत्नीवरही सरकार प्रसन्न झाले आहे. त्यांना फर्स्ट क्लास किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासने कुठेही कितीही मोफत प्रवास करता येणार आहे. सेवानिवृत्ती वेतनातही तब्बल 12 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या दरमहा 8 हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन दिलं जाते. ते 20 हजारावर जाणार आहे. ही आकडेवारी पाहता कोण म्हणेल भारताची लाकेशाही व अर्थव्यवस्था दुबळी आहे ?

Monday, August 2, 2010

राष्ट्रकुलचा महाघोटाळा

आयपीएलच्या पाठोपाठ राष्ट्रकुल क्रीडा संयोजन समितीने विविध 16 स्टेडियमच्या बांधकामातील घोटाळे उघड केले आहेत. अलीकडे भारतीय खेळाडू विविध खेळ आणि मैदाने गाजवत आहेत. क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मात्र जमेल ते ओरबाडण्यात गुंतले आहेत. 72 देशांचा सहभाग असलेल्या राष्ट्रकुल खेळ स्पर्धा येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांच्या प्रतिनिधींनी स्टेडियमच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर भारतात होणार्‍या घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. नंतर स्टेडियमची कामे रेंगाळल्याची चर्चा होती. आता केंद्रीय दक्षता आयोगानेच स्टेडियमच्या बांधकामातील महाघोटाळ्याची तक्रार क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. प्रसार माध्यमांनी त्यातील गंभीर गैरप्रकार चव्हाट्यावर आणले. या घोटाळ्याचे धागे-दोरे बरेच खोलवर पोहोचले असावेत. संयोजन समितीचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी त्याबद्दल इन्कार केला खरा, पण त्या इन्काराचे पोकळपण पत्रकारांना त्यांच्या चेहर्‍यावर वाचता आले. 655 कोटी रुपये खर्चाचा मूळ आराखडा आता बेहिशेब वाढला आहे. आजवर 24 हजार कोटींहून जास्त खर्च झाला आहे. काही कामे अजून पूर्ण नाहीत. जी पूर्ण झाली ती समाधानकारक नाहीत. लाखो पाऊंडांच्या रकमा परकीय चलनात विदेशातील काही व्यक्तींच्या खासगी कंपन्यांच्या खात्यात जमा झाल्या आहेत. त्याबद्दलचे कसलेही कागद किंवा करारपत्र उपलब्ध नाहीत. तशी कबुली संबंधित विदेश निवासी व्यक्तीने दूरदर्शन वाहिन्यांवर दिली आहे. लंडनमधील भारतीय वकिलातीने त्याबद्दल कानावर हात ठेवले आहेत. तर संयोजन समितीच्या अध्यक्षांनी तेथील कारकून दर्जाच्या व्यक्तीचे नाव सांगून वेळ मारुन नेण्याचा लाजीरवाणा प्रयत्न केला आहे. यापूर्वी क्रिकेटचा आयपीएल घोटाळा उघड झाला. तो अद्याप गाजत आहे. त्या संघटनेवर ना. शरद पवार यांची हुकूमत चालते. राष्ट्रकुल स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्षपद खा. कलमाडींकडे आहे. दोघेही मराठी खासदार खास पुणेरी आहेत. सहाजिकच घोटाळ्यांच्या इतिहासात महाराष्ट्राचे नाव लाल शाईने लिहिले जाईल. पेशवाईनंतर पुण्याची दुष्कीर्ती जगात घोटाळ्यांनी अजरामर करण्याचा मान यानिमित्ताने दोन बाजीरावांना मिळू पहात आहे. संपत्तीच्या मोहाने भल्याभल्यांची बुद्धी डगमगते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या क्विन बॅटन रिलेच्या सोहळ्यातही कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. यंदाच्या घोटाळ्याचे धागे-दोरेसुद्धा आत्ताच लंडनपर्यंत पोहोचले आहेत. भारतात भ्रष्टाचारापासून कोणतेही क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही. जे केंद्रीय पातळीवर दिल्लीत घडते त्याचेच ओघळ गल्लीपर्यंत झिरपत असतात. हे उबगवाणे चित्र भारताच्या महासत्ता बनण्याच्या स्वप्नाला छेद दिल्याशिवाय कसे राहील?